मुंबई दि. 22 : राज्यात 15 मे २०२० पासून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येत आहे. काल दिवसभरात 3 हजार 907 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आली. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात 3 हजार 709 ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी दिली.
मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर, राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी 9,322 अनुज्ञप्ती सुरू आहेत. राज्य शासनाने 3 मे, 2020 पासुन लॉकडाऊन कालावधीत सीलबंद मद्यविक्री सुरु करण्याबाबत मार्गदर्शक तत्वे जारी केलेली आहे. राज्यात 15 मे 2020 पासून घरपोच मद्यविक्री योजनाअंमलात आली असून ग्राहकांना घरपोच मद्यविक्री सेवा देण्यात येतआहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने तयार केलेल्या https://aaplesarkar.mahaonline.gov.in या संकेतस्थळावर मद्यसेवन परवाना ऑनलाईन प्राप्त करण्याची सुविधा उपलब्ध आहे. १ एप्रिल २०२० ते 18 सप्टेंबर २०२० या काळात एक लाख 56 हजार 085 ग्राहकांनी मद्यसेवन परवाने मिळवण्यासाठी अर्ज केले होते; यापैकी एक लाख 50 हजार 955 ग्राहकांना परवाने मंजूर करण्यात आले आहे.
ऑनलाईन मद्यसेवन परवाना घेताना येत असलेल्या सर्व तांत्रिक अडचणींची सुधारणा करण्यात आली असूनआता इच्छुक व्यक्ती संगणक, लॅपटॉप, अँड्रॉइड फोन, तसेच IOS प्रणालीव्दारे ऑनलाईन परवाने घेऊ शकतात. तसेच कोणाला ऑनलाईन परवाना घ्यायाचा नसेल तर राज्य उत्पादन शुल्कविभागाच्या सर्व अधीक्षक/निरीक्षक/दुय्यम निरीक्षकांच्या कार्यालयात दररोज मद्यसेवन परवाने Offline पध्दतीने सुध्दा उपलब्ध आहेत. मद्यसेवन परवाने एक वर्षाकरिता रु.100/- किंवा आजीवन परवान्याकरीता रु.1,000/- एवढे शुल्क अदा करुन मिळू शकतात.
वर्ष 2020-2021 करिता विभागाला 19,225 कोटी रु. महसूल उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 पर्यत विभागाला 3842.32 कोटी रु महसूल मिळाला असून गतवर्षीच्या तुलनेत 37% घट झालेली आहे.
माहे एप्रिल ते ऑगस्ट 2020 या कालावधीत देशी मद्याची 9.40 को. ब.लि., विदेशी मद्याची 5.88 को. ब.लि., बियर 5.23 को.ब.लि. आणि वाईनची 17.62 लाख ब.लि. विक्री झाली असून गतवर्षीच्या तुलनेत देशी मद्य 38%, विदेशी मद्य 33% बियर मद्य 63%, तर वाईन मद्य 39% घट झालेली आहे.
24 मार्च, 2020 पासून राज्यात लॉकडाऊन सुरु आहे.महाराष्ट्र राज्यात शेजारील राज्यांमधुन होणारी अवैध मद्य तस्करी रोखण्यासाठी सर्व विभागीय उप आयुक्त तसेच संबंधित अधीक्षकांनी नाकाबंदी केली असुन 12 सीमा तपासणी नाक्यांवर विभागातीलअधिकारी/कर्मचारी तैनात आहेत. काल 21 सप्टेंबर २०२० रोजी राज्यात 65 गुन्हे नोंदविण्यात आले असून 47 आरोपींना अटक करण्यात आली असून 07 लाख 79 हजार रूपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
01 एप्रिल, २०२० पासुन 21 सप्टेंबर २०२० पर्यंत लॉकडाऊन काळात राज्यात एकूण 18,587 गुन्हे नोंदविण्यात आले असून 10,104 आरोपींना अटक करण्यात आली असून 1718 वाहने जप्त करण्यात आली असून ४2 कोटी 76 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आलाआहे.
अवैध मद्य निर्मिती वाहतूक, विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24X7 सुरू आहे. त्यावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. यासाठी टोल फ्री क्रमांक – १८००८३३३३३३ व्हाट्सअप क्रमांक – ८४२२००११३३ हा असून