वाराणसी -राजभाषेचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा स्थानिक भाषांचा विकास होईल आणि स्थानिक भाषा सातत्याने तेव्हाच विकसित होऊ शकतात जेव्हा राजभाषा देशभरात मजबूत होईल, या दोन्ही एकमेकांसाठी पूरक आहेत.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज वाराणसीमध्ये गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाने आयोजित अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचा शुभारंभ केला. या संमेलनात विविध सत्रांमध्ये हिंदीच्या अधिक वापराला प्रोत्साहन देण्याबाबत विचारमंथन केले जाईल.केन्द्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की सर्व हिंदी भाषक प्रेमींसाठी देखील हे संकल्प करण्याचे वर्ष असायला हवे. जेव्हा स्वातंत्र्याची शंभर वर्षे पूर्ण होतील तेव्हा देशात राजभाषा आणि आपल्या सर्व स्थानिक भाषा एवढ्या बुलंद व्हाव्यात कि कुठल्याही परदेशी भाषेची मदत घेण्याची गरज भासू नये. राजभाषेचा विकास तेव्हाच होऊ शकतो जेव्हा स्थानिक भाषांचा विकास होईल आणि स्थानिक भाषा सातत्याने तेव्हाच विकसित होऊ शकतात जेव्हा राजभाषा देशभरात मजबूत होईल असे ते म्हणाले. या दोन्ही बाबी एकमेकांसाठी पूरक आहेत. स्थानिक भाषा मजबूत करणे हे राजभाषा विभागाचे काम आहे आणि राजभाषा मजबूत करणे हे जनतेचे उद्दिष्ट असायला हवे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात भारताचे विचार आपल्या राजभाषेत मांडून राजभाषेचा गौरव वाढवला. ते म्हणाले की जो देश आपली भाषा गमावतो तो कालांतराने आपली सभ्यता, संस्कृती, आणि आपले मौलिक चिंतन देखील गमावतो. जो देश आपले मौलिक चिंतन गमावतो तो जागतिक विकासात योगदान देऊ शकत नाही. म्हणूनच आपल्या भाषांचे जतन आणि संवर्धन करणे खूप महत्वपूर्ण आहे.केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री म्हणाले की या संमेलनाच्या माध्यमातून देशभरातील पालकांना आवाहन आणि विनंती करतो की त्यांनी आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावे. मुले कुठल्याही माध्यमात शिकत असतील तरी घरी त्यांच्याशी मातृभाषेतच संवाद साधा आणि त्यांचा आत्मविश्वास वाढवा.