मुंबई- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घोषणा केली आहे.१ एप्रिल पासून नाही तर आजपासूनच त्यांनी सरकार इंधनावरील वाहन खरेदी करणार नाही आणि खरेदी करायचीच असेल तर ती फक्त इलेक्ट्रिक वाहनांचीच करेल अशी घोषणा केल्याने आता यापूर्वीचे राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी यंत्रणेने जर गाड्या खरेदीची प्रोसेस सुरु केली असेल तर ती त्यांना थांबावी लागेल एवढेच नव्हे तर भाड्याने घेण्यात येणाऱ्या इंधनावरील गाड्यांचे कार्याचे काय ? हा प्रश्न उपस्थित करत नको झंझट म्हणत आता इंधनावरील भाड्याने घेतलेल्या गाड्या माघारी पाठवून त्यांना इलेक्ट्रिक गाड्यांचीच मागणी करावी लागणार आहे . अशा सर्व संदिग्ध पातळीवर सरकरी आणि निमसरकारी यंत्रणेला आता सावरायला किमान १५ दिवसांचा अवधी आणि सरकारचे स्पष्ट आदेश हाथी असले तर हे शक्य होणार आहे हेही निश्चित मानले जातेय .
गाड्यांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिकच असतील, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.दरम्यान, हा निर्णय याआधीच राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.