मुंबई दि.१३ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७५ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २५६ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.
राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७५ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-
आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल
■ व्हॉट्सॲप- १९५ गुन्हे
■ फेसबुक पोस्ट्स – १९४ गुन्हे दाखल
■ टिकटॉक व्हिडिओ- २४ गुन्हे दाखल
■ ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – ८ गुन्हे दाखल
■ इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- ४ गुन्हे
■ अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५० गुन्हे दाखल
■ वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५६ आरोपींना अटक.
■ १०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश
■ पुणे ग्रामीण मध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद
पुणे विभागात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ४१ वर
■ सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाईलवर कोरोना महामारीबाबत सरकार ज्या उपाययोजना करत आहेत त्यावर टिपणी करताना त्यास राजकीय रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट शेअर केली होती .त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.
महाराष्ट्र सायबरचे आवाहन
डेबिट व क्रेडिट कार्ड वापर
सध्याच्या काळात इंटरनेटचा वापर वाढत असल्याने सायबर भामटे वेगवेगळ्या युक्त्यांचा वापर करून सामान्य नागरिकांना फसवित आहेत . कधी ते नागरिकांना खोट्या ऑफर्सच्या मोहात पाडून एखादे मोबाईल ॲप डाउनलोड करायला लावतात व त्यांच्या फोनचा ताबा मिळवतात . तर कधी sms किंवा ई-मेल करून एखाद्या बक्षिसाचे आमिष दाखवून नागरिकांना एखद्या लिंकवर क्लिक करायला लावतात व त्यातून सर्व वैयक्तिक माहिती व बँक खात्याची माहिती घेऊन फसवितात . तर कधी फोन करून व अतिशय गोड भाषेत बोलून बेमालूमपणे नागरिकांकडून त्यांची सर्व बँक डिटेल्स, डेबिट व क्रेडिट कार्ड पिन क्रमांक ,CVV क्रमांक घेतात व तसेच बोलण्यात गुंतवून फोनवर आलेला OTP पण काढून घेतात व फसवितात . तर कधी कधी तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये एक malware डाउनलोड करून तुमच्या सर्व फाइल्सला पासवर्ड टाकतात व त्या फाइल्स अनलॉक करण्यासाठी खंडणी मागतात .
महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना विनंती करते कि, तुम्ही इंटरनेट वापरताना सावध राहा . आपल्या सोशल मिडिया अकाउंटचा पासवर्ड,इंटरनेट बँकिंगचा पासवर्ड ,आपले डेबिट व क्रेडिट कार्डसचे पिन क्रमांक ,CVV क्रमांक ,ईमेलचे पासवर्ड,UPI ,Paytm इत्यादी मोबाईल wallet चे पिन नंबर कोणाला देऊ नका . शक्यतो प्रत्येक नेट बँकिंग अकाउंटचा पासवर्ड वेगळा ठेवा . कोणत्याही व्यक्तीने एखादे नवीन किंवा अनोळखी मोबाईल अँप तुमच्या मोबाईलवर डाउनलोड करायला सांगितले तर शक्यतो तसे करणे टाळा . तुम्हाला sms किंवा इमेलवर येणाऱ्या अनोळखी लिंकवर क्लीक करून आपली सर्व माहिती कुठेही देऊ नका .
जर काही औषध किंवा खाण्याचे पदार्थ ऑनलाईन ऑर्डर करणार असाल तर शक्यतो Cash on delivery चा पर्याय निवडा . जर वेबसाईटवर क्लिक करणार असाल तर ती वेबसाईट https या पासून सुरु होत असेल व त्याचा डाव्या बाजूला बंद कुलुपाची खूण असेल तर ती वेबसाईट शक्यतो फेक नसते . तसेच कुठल्याही paytm ,UPI किंवा तत्सम wallet मधून एक रुपया ट्रान्सफर करायचे transaction करू नका . तसेच कोणतीही payment wallet कंपनी त्यांच्या ग्राहकांचे KYC (Know Your Customer ) documents फोनवर उपडेट करत नसते . नागरिकांनी हे पण लक्षात ठेवणे तितकेच गरजेचे आहे कि तुमच्या खात्यात जर काही रक्कम जमा होणार असेल तर त्यासाठी कोणी OTP मागत नसतो.