मुंबई-नाशिकच्या साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडच्या दोन कार्यकर्त्यांकडून शाईफेकली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हे कृत्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे.ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेकण्यात आल्याचे समजल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीचे केंद्रं असते. तुम्हाला जर दुसरी अभिव्यक्ती व्यक्त करायची असेल तर दुसरे कुठेही करता येते. अभिव्यक्ती करण्याऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे आणि शाईफेक करणे योग्य नाही, असे फडणवीस त्यांनी म्हटले आहे.तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपल्या सर्वांचेच दैवत आहेत. काही चुकीचे लिहिले असेल तर त्याचा निषेधच झाला पाहिजे. परंतू साहित्य संमेलनात शाईफेक करणे हे चुकीचे आणि निषेधार्ह आहे. संमेलन ही अभिव्यक्तीची जागा आहे. चुकीच्या विचारांना तर्क आणि पुराव्यांनी उत्तर दिले पाहिजे.