पुणे-पुण्यासह,कोल्हापूर,सांगली येथील पूर आणि पूरग्रस्त आपत्तीबाबतच्या कारणांबाबत पत्रकारांनी छेडले असता ,पूरग्रस्त नावाच्या आपत्तीला कॉंग्रेस जबाबदार असल्याचे एक कारण देखील असल्याचे आज पुणे महापालिकेत आल्यावर पुण्याचे पालकमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी येथे सांगितले .
चंद्रकांत पाटील हे पुणे महापालिकेच्या आढावा बैठकीसाठी पुण्यात आले होते. त्यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमधल्या पंचगंगा नदीची पूररेषा बदलली का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. याच प्रश्नाला उत्तर देत असताना चंद्रकांत पाटील यांनी ही पूररेषा आघाडीच्या काळातच बदलली गेली असल्याचं म्हटलं आहे. पुणे अलमट्टी धरणाची उंची केंद्रात आणि राज्यात आघाडीचे सरकार असताना वाढवण्यात आली. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही ठिकाणी आलेला पूर हे नैसर्गिक संकट आहे मात्र या पुराला आघाडी सरकारही जबाबदार आहे असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मागील काही वर्षांचा पावसाचा अंदाज लक्षात घेता कोयना, अलमट्टी धरणातून राज्यातील मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागाकडे पाणी कसे वळवता येईल या दृष्टीने सरकार विचार करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या पुराला आघाडी सरकार जबाबदार आहे. पंचगंगा नदीची पूररेषा बांधकाम व्यावसायिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बदलली नाही तर आघाडीच्या काळातच ती बदलण्यात आली असे स्पष्टीकरण चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे. २००५ मध्ये कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पूर आला होता. त्यावेळी पूररेषा आखण्यात आली होती. मात्र त्यानंतर सहा वर्षांनी म्हणजेच २०११ मध्ये केंद्रात आणि राज्यात सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पंचगंगा नदीची पूररेषा बदलली असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूररेषा बदलल्याचा आरोप झाला. मात्र या आरोपात काहीही तथ्य नाही असेही पाटील यांनी म्हटले आहे.त्यांनी काय नेमके म्हटले आहे ते त्यांच्याच शब्दात ऐका ……