नवी दिल्ली – गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीत हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचारात 20 जणांनी प्राण गमावले आहेत. या हिंसाचारावरून काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोेनिया गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. ही हिंसा सुनियोजित कट होता. केंद्र सरकार आणि अमित शाह यासाठी जबाबदार आहेत. गृहमंत्र्यांनी हिंसेची जबाबदारी घेऊन आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली आहे. आज दिल्लीच्या परिस्थितीवर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत ही मागणी केली. तसेच दिल्लीकरांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार परिषद पार पडली. दिल्लीतील हिंसाचार हा चिंतेचा विषय आहे. या हिेंसेमागे एक सुनियोजित कट होता. या हिंसाचारामुळे 20 जण मृत्यूमुखी पडले. 72 तासांत केंद्राने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही. केंद्र सरकारच्या दुर्लक्षामुळे दिल्लीत 20 जणांचा बळी गेला. भाजप नेत्याकडून चिथावणीखोर वक्तव्यामुळे हिंसाचार घडला. हिंसा पाहता केंद्र सरकार आणि अमित शाह यासाठी जबाबदार आहेत. अमित शहांनी याची जबाबदारी घेऊन आपला गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी सोनिया गांधी यांनी केली आहे. दरम्यान दिल्लीतील जनतेने शांतता राखावी असे आवाहनही सोनिया गांधी यांनी केले आहे. सोनिया गांधींनी यावेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावरही निशाणा साधला. गेल्या रविवारपासून दिल्लीचे मुख्यमंत्री कुठे होते असा सवालही यावेळी उपस्थित केला.