मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वाढती रुग्णसंख्या सध्या चिंतेचा विषय असून कोरोनाचा सामना राज्य सरकार कसा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाउनच्या तयारीचे निर्देश देऊन प्रशासन व जनतेची मानसिकता यावर मंथन सुरु केले असताना महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने लॉकडाऊनला जाहीरपणे विरोध दर्शवला आहे. राज्यात कडक निर्बंध लावावेत असा सरकारमध्ये सूर आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढत्या कोरोनावर सायंकाळी पाच वाजता वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे या बैठकीत महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. बैठकीनंतर उद्धव ठाकरे रात्री ८.३० वाजता जनतेला संबोधित करणार आहेत. यावेळी राज्यात कोरोणाचा सामना कसा केला जाईल हे ठाकरे सांगतील अशी सर्वांना अपेक्षा आहे.