पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोट्यावधी हिंदूंना दिलेला शब्द पाळला
पुणे : आजचा दिवस सर्वांसाठी ऐतिहासिक आहे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी कोट्यावधी हिंदूंना दिलेला शब्द पाळला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने कार्यवाही करुन ट्रस्टची स्थापना केली. तसेच, श्री रामचंद्रांच्या मंदिर उभारणीसाठी जमीन उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आता अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांचे मंदिर लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी व्यक्त केला.
श्री. पाटील म्हणाले की, पंतप्रधान मोदीजींनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित विषय पूर्ण केले आहेत. अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य दिव्य मंदिर उभारणे हा त्यातीलच एक विषय आहे. माननीय सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा देशभरातल्या हिंदू आणि मुस्लिमांनी आदर केला. त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार, अयोध्येत प्रभू श्री रामचंद्रांचे भव्य मंदिर उभारण्यासाठी कायदा करुन, जमीन उपलब्ध करुन दिली. त्यानंतर आता मंदिर उभारणीसाठी श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करुन, मंदिर उभारण्याच्या कामाला गती दिली.
या निर्णयासाठी मोदीआणि संपूर्ण मंत्रिमंडळाचे मनापासून अभिनंदन आणि आभार. अयोध्येत प्रभू श्री रामांचे जे स्वप्न सर्व भारतीयांनी पाहिले होते. ज्यासाठी लाखो रामभक्तांनी संघर्ष केला, आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. ते अयोध्येत भव्य राम मंदिर उभारण्याचे स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल, यात तिळमात्र शंका नाही. असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.