मुंबई-सीबीआयने मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांना 100 कोटी रुपयांच्या वसुली संदर्भात चौकशीसाठी बोलावले आहे. मात्र, दोघांनीही सीबीआय कार्यालयात येण्यास नकार दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या उत्तरात दोघांनी म्हटले आहे की सीबीआय त्यांच्या कार्यालयात येऊन चौकशी करू शकते. यापूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणामध्ये देखील राज्य आणि सीबीआयमधील वाद पाहायला मिळाला होता.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर लावलेल्या 100 कोटींच्या खंडणीच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्या ठिकाणांवर छापे टाकले आहेत आणि त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून अनिल देशमुख सार्वजनिक ठिकाणी कुठेही दिसत नाहीत. गेल्या तीन महिन्यांपासून देशमुख यांनी त्यांचा मतदारसंघ काटोलला देखील भेट दिलेली नाही.