मुंबई। महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी नाशिकमध्ये झालेल्या २२ लोकांच्या मृत्यूची कसून चौकशी करण्याची मागणी केली आहे. नाशिकमध्ये घडलेली ही घटना प्रचंड संतापजनक आणि दुर्दैवी असून मृतांच्या कुटुंबियांप्रति त्यांनी शोक व्यक्त केला आहे.
प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महाराष्ट्र सरकारकडे मागणी केली आहे की, ऑक्सिजनची रिफिलिंग करताना लिकेज झाल्यामुळे घडलेल्या या घटनेची सखोल चौकशी व्हावी आणि मृतांच्या कुटुंबियांना तात्काळ मदत जाहीर करण्यात यावी. पुढे सांगताना ते म्हणाले की, गेल्या २ महिन्यात महाराष्ट्रातील रुग्णालयांमध्ये घडलेली ही आठवी घटना आहे. यामध्ये काही ठिकाणी कोविड सेंटरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे तर काही ठिकाणी इतर कारणांमुळे लहान मुलांसह रुग्णालयांमध्ये भरती झालेल्या रुग्णांना अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यांनी महाराष्ट्रातील सर्व रुग्णालयांमध्ये आरोग्यासह सुरक्षा आणि योग्य व्यवस्था पुरवण्याची मागणीदेखील केली आहे. पाटील यांनी नाशिकमधील या रुग्णालयाच्या सर्व आजारी लोकांची सुरक्षित शिफ्टिंग आणि योग्य उपचाराची व्यवस्था करण्याच्या मागणीसह या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.