मुंबई-महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. आता रमेश बैस हे महाराष्ट्राचे नवे राज्यपाल असणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विविध वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रात अनेकदा वाद निर्माण झाला . युवराज संभाजीराजे भोसले, उदयनराजे भोसले, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.त्यासाठी मोर्चे आंदोलने करण्यात आली .केंद्रावरही त्यांचा राजीनामा घेण्यासाठी दबाव टाकण्यात आला. या साऱ्या पार्श्वभूमीवर कारवाईची नामुष्की टाळण्यासाठी स्वतः कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली होती.
महाराष्ट्राच्या राज्यपालपदासाठी सुरुवातीला लोकसभेच्या माजी अध्यक्षा तथा भाजप नेत्या सुमित्रा महाजन यांचे नाव चर्चेत होते. पण त्या मुंबईच्या असल्यामुळे त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर गुजरातमधील एका नेत्याचे नाव चर्चेत आले. पण ते ही मागे पडले. आता अचानक काँग्रेसचे माजी बंडखोर नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे नाव समोर आले होते. मात्र आता सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.रमेश बैस आता नवे राज्यपाल असणार आहेत
भगतसिंह कोश्यारी यांचे वादग्रस्त वक्तव्य
- औरंगाबादमध्ये 27 फेब्रुवारी भगतसिंह कोश्यारी यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले की, महाराजा, चक्रवर्ती सगळे झाले. चाणक्याशिवाय चंद्रगुप्ताला कोण विचारेल, समर्थांशिवाय शिवाजीला कोण विचारेल?,
- राज्यातील खरे हीरो आता शिवाजी नसून नितीन गडकरी आणि शरद पवार आहेत.
- सावित्री बाईंचे लग्न 10 व्या वर्षी झाले, तेव्हा त्यांच्या पतीचे वय हे 13 वर्ष होते. कल्पना करा की मुलगा मुलगी लग्नानंतर काय करत असतील.
- अटलबिहारी वाजेपयी यांचा अपवाद वगळता आधीचे सरकार राष्ट्रीय सुरक्षेबद्दल गंभीर नव्हते.
- मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हटले जाते. मात्र, गुजराती आणि राजस्थानी लोकांना काढून टाकल्यास मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलेच जाणार नाही.