मुंबई-शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना जामीन झाल्यावर “सावधान रहो शेर आ रहा है…” असा इशारा शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. ते म्हणाले,’अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभा राहिले, हिंमतीने उभा राहिले.”
त्यांना अखेर पीएमएल कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. यामुळे ठाकरे गटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसैनिक जल्लोष साजरा करत आहेत.
भास्कर जाधव म्हणाले, “आम्ही आज सगळेच आनंदअश्रूंमध्ये न्हाऊन निघतोय. याचं कारण असं आहे की संजय राऊत हे आमचे नेते आहेत. एक लढवय्ये नेते आहेत, तत्वनिष्ठ नेते आहेत. आपल्या भूमिकेशी ठाम राहणारे नेते आहेत. हे नेते मागील चार-दोन वर्षे या देशात जो लोकशाहीवर घाला घातला जात होता. या लोकशाहीचं अधंपतन केलं जात होतं. या लोकशाहीच्या नावाने, सत्तेचा दुरुपयोग करून संपूर्ण देशाला अधोगतीकडे नेण्याचं काम सुरू होतं, त्याविरोधा ते आपल्या लेखणीने प्रहार करत होते. त्यांना विविध प्रकारे थांबवण्याचा प्रयत्न झाला. परंतु ते काही थांबवू शकले नाहीत आणि मग शेवटचा उपाय म्हणून त्यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. तुरुंगात टाकत असताना अतिशय खोट्या केसेस तयार केल्या, खोटे पुरावे तयार केले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. परंतु जेलमध्ये गेल्यानंतरही संजय राऊत हे दमले नाहीत, थकले नाहीत. कोणत्याही प्रकारे त्यांनी शरणागती पत्कारली नाही. किंबहूना ते अधिक ताकदीने उभा राहिले, हिंमतीने उभा राहिले.”