– महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांतील 85 शहरांमध्ये 919 पथनाट्यांचे आयोजन, त्यायोगे आर्थिक साक्षरतेचा प्रसार
– ‘आयआयएफएल फाउंडेशन’च्या छत्राखाली आयोजित
प्रतिनिधी -आयआयएफएल फायनान्स या आयआयएफएल फाऊंडेशनसमवेत भारतातील सर्वात मोठी नॉन-बँकिंग फायनान्स कंपन्यांपैकी एक या संस्थेसमवेत महाराष्ट्र आणि गोव्यातील सर्व जिल्ह्यांतील 85 शहरांमध्ये 919 पथनाट्ये सादर केली. समाजात आर्थिक साक्षरतेला चालना देण्यासाठी या दोन्ही संस्थांनी मिळून यासाठी सुमारे 15,600 किमीचा प्रवास केला.
कोल्हापुरात राहणाऱ्या सामान्य लोकांच्या जीवनातील कथानके या पथनाट्यांमध्ये रेखाटण्यात आली आहेत. आपल्या पैशांची बचत करून त्या रकमेचा उपयोग उद्योजक बनण्यात आणि आपले सुवर्ण भवितव्य तयार करण्यात या लोकांनी कसे केले, हे यामध्ये दाखविण्यात आले आहे. ही पथनाटके रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या हजारो नागरिकांनी उत्सुकतेने पाहिली. सर्वसामान्यांना अर्थशिक्षित करण्यासाठी आयोजित ‘आयआयएफएल फायनान्स’च्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक सर्व स्तरातील लोकांनी केले. आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवावे याबद्दल प्रेक्षकांना मार्गदर्शन करण्यासाठी ‘आयआयएफएल फायनान्स’चे अधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.
या उपक्रमाविषयी बोलताना आयआयएफएल फाऊंडेशनचे अशोक मित्तल म्हणाले, “आयआयएफएल फायनान्स ही पर्यावरणीय, सामाजिक आणि प्रशासनिक (इएसजी) उद्दीष्ट्ये निर्माण करण्याचे ध्येय असलेली एक जबाबदार संस्था आहे. आर्थिक साक्षरता ही केवळ एखाद्या व्यक्तीची उद्दीष्ट्ये आणि स्वप्ने गाठण्यासाठी नसते; तर ती निकोप आणि न्याय्य समाजाच्या बांधणीतील एक कोनशिलादेखील असते. ‘आयआयएफएल’च्या तत्त्वज्ञानाच्या अनुषंगाने, आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग मिळवण्यासाठी आर्थिक स्वावलंबनावर भर देण्याची शिकवण या पथनाट्यांतून देण्यात येते.”
आयआयएफएल फायनान्स ही बॅंकेतर वित्तपुरवठा कंपनी सार्वजनिक गृह व मालमत्ता कर्ज, सोनेतारण कर्ज, रोखेतारण कर्ज, लघु व मध्यम उद्योगांना कर्ज तसेच सूक्ष्मठेवी कर्ज या व्यवसायात गुंतलेली आहे. ती ठेवी स्वीकारत नाही. ‘आयआयएफएल फायनान्स’कडे ‘क्रिसिल’द्वारे देण्यात आलेले एए (स्थिर), ‘इक्रा’चे एए (स्थिर) आणि ‘केअर’चे एए (पॉझिटिव्ह) एवढी पतमानांकने आहेत.