मुंबई, : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त (२१ ऑगस्ट) गोदरेज लॉक्स या भारतातील लॉकिंग उत्पादने व सुविधांच्या सर्वाधिक विश्वसनीय ब्रॅंडने ‘सुरक्षा चर्चा’ हा अभिनव मंच सुरु केला. देशभरातील ज्येष्ठ नागरिकांना घराच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करणे हा या मंचाचा उद्देश आहे. देशातील नागरिकांना घराच्या सुरक्षिततेबद्दल जागरूक करण्यासाठी गोदरेज लॉक्सने चालविलेल्या ‘हर घर सुरक्षित’ या भारतातील सर्वात मोठ्या जनजागृती अभियानांतर्गत हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे आयोजन दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, चंदिगढ, कोलकाता आणि बंगलोर या शहरांमध्ये केले जाणार असून त्याद्वारे देशभरातील १००० पेक्षा जास्त ज्येष्ठ नागरिकांपर्यंत घराच्या सुरक्षिततेबद्दलची उपयुक्त माहिती पोहोचवली जाईल.जगात सर्वात सुरक्षित जागा म्हणजे आपले घर असे जरी प्रत्येक कुटुंबात मानले जात असले तरी वास्तव हे आहे की ६४% भारतीय हे घराच्या सुरक्षेला असलेल्या चोरी, दरोडे यासारख्या धोक्यांना रोखण्यासाठी पुरेसे सक्षम नाहीत. प्रत्येक क्षणी घराची देखरेख करणे शक्य नसते, याचाच फायदा दरोडेखोर आणि चोरांना मिळतो. कितीतरी घरांमध्ये वयस्क व्यक्ती असतात, ज्यांना बऱ्याचदा एकटे ठेवावे लागते किंवा केअरटेकर किंवा घरातील नोकरांच्या भरवशावर ठेवले जाते. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या (एनसीआरबी) २०१७ सालच्या अहवालानुसार २०१६ साली ज्येष्ठ नागरिकांसोबत घडलेल्या तब्बल २१,४१० गुन्ह्यांची नोंद करण्यात आली त्यापैकी १०२४ प्रकरणे फक्त दरोड्यांची होती. यावरून हे स्पष्टपणे दिसून येते की, घराच्या चार भिंतींच्या आत देखील ज्येष्ठ नागरिक सुरक्षित नाहीत आणि त्यांना याबाबत जागरूक करणे अत्यंत गरजेचे आहे.
२०१८ मध्ये १५ नोव्हेंबर रोजी घर सुरक्षा दिनाचे औचित्य साधून गोदरेज लॉक्सने ‘हर घर सुरक्षित’ हे राष्ट्रव्यापी अभियान सुरु केले. भारतातील प्रत्येक घर सुरक्षित असावे हा या अभियानाचा उद्देश आहे. फक्त घराच्या बाहेरच नव्हे तर घराच्या चार भिंतींच्या आत देखील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षेला किती धोका आहे हे ओळखून गोदरेज लॉक्सने ‘सुरक्षा चर्चा’ या मंचाची संकल्पना तयार केली. भारतातील विविध ज्येष्ठ नागरिक संघटनांच्या सहयोगाने हा मंच चालविला जाणार आहे. गोदरेज लॉक्सचे सुरक्षा तज्ञ एका दोन दिवसीय कार्यक्रमातून ज्येष्ठ नागरिकांसोबत चर्चेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या समजून घेतील, त्यांच्या सुरक्षाविषयक गरजा नेमक्या काय आहेत ते जाणून घेतील व ज्येष्ठ नागरिकांनी स्वतःच स्वतःच्या, घराच्या आणि समाजाच्या सुरक्षेची काळजी कशी घ्यायची याबद्दल माहिती देतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या ‘सुरक्षा चर्चा’ मंचाबद्दल बोलताना गोदरेज लॉक्सचे कार्यकारी उपाध्यक्ष व बिझनेस हेड श्री. श्याम मोटवानी यांनी सांगितले, “विश्वास आणि सुरक्षा यांचे दुसरे नाव म्हणून ओळखला जाणारा ब्रँड या नात्याने आम्ही देशातील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षाविषयक गरजा जाणतो. घरी असो किंवा बाहेर, ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या सुरक्षेबाबत स्वावलंबी व्हावे यासाठी आम्ही ‘सुरक्षा चर्चा‘ या मंचाची संकल्पना तयार केली. त्याचप्रमाणे आम्हाला असेही वाटते की, प्रत्येक कुटुंबाने अशा सुरक्षा प्रणालींचा वापर करावा ज्यामुळे ज्येष्ठांच्या मनात सुरक्षेची भावना दृढ होईल. आम्हाला पूर्ण खात्री आहे की या मंचामुळे १००० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरिक त्यांच्या स्वतःच्या व घराच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी सक्षम होतील.”
मुंबईमध्ये समन्वय या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेसोबत ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे उदघाटनपर सत्र गोदरेज लॉक्सने आयोजित केले होते. ७० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरीक यावेळी उपस्थित होते. मुंबईमध्ये समन्वय या ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेसोबत ‘सुरक्षा चर्चा’ मंचाचे उदघाटनपर सत्र गोदरेज लॉक्सने आयोजित केले होते. ७० पेक्षाही जास्त ज्येष्ठ नागरीक यावेळी उपस्थित होते. गोदरेज लॉक्सच्या तज्ञांनी यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी घराच्या सुरक्षिततेसंदर्भातील एक मोड्यूल दाखवले. उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी घर सुरक्षा उपाययोजनांचा वापर करण्याबाबत दाखवलेला उत्साह खूपच प्रेरणादायी होता. पहिल्या ‘सुरक्षा चर्चा’ मंचासाठी हेल्पएज इंडियाचे संचालक श्री. प्रकाश बोरगावकर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिकांचा एकटेपणा व सुरक्षितता या विषयावर भाषण देण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले होते.या उपक्रमाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना हेल्पएज इंडिया या ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेचे संचालक श्री. प्रकाश बोरगावकर यांनी सांगितले, “भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस मजबूत होत चालली आहे. तरुणांना मोठ्या पगाराच्या आणि खूप जास्त वेळेची मागणी करणाऱ्या नोकऱ्या मिळत आहेत, त्यामुळे कुटुंबे संकुचित होत चालली आहेत, ज्येष्ठ नागरिकांना फारशी कोणाची सोबत मिळत नाही. असे एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक हे चोर, गुन्हेगारांच्या तावडीत सहज सापडतात. म्हणूनच ज्येष्ठ नागरिकांना अडीअडचणींची, आव्हानांची माहिती असायला हवी, प्रत्येक अडचणींचा सामना कसा करायचा याची माहिती त्यांना असायला हवी. गोदरेज लॉक्सने हा उपक्रम सुरु केला याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटते. यामुळे हे जग, हा समाज ज्येष्ठ नागरिकांसाठी अधिकाधिक सुरक्षित बनण्यात मोठे मोठे योगदान दिले जाईल.”