मुंबई- महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल २२ जानेवारी, २०२१ रोजी जाहीर करण्यात आले यात आम आदमी पार्टीला जबरदस्त विजय मिळाला असून २९ उमेदवार विजयी झाले आहेत!
हि “आप” ने बघितलेल्या स्वप्नपूर्तीची सुरुवात असून, आम आदमी पक्षाची ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात विजयी उमेदवारांची अंतिम संख्या १४५ सदस्यांची असून त्यामध्ये लातूर मध्ये एक आणि गडचिरौली मध्ये दोन गावात संपूर्ण पॅनेल आहेत. हा विजय फक्त ३०० उमेदवार निवडणुकीत उभे करून मिळवला असून पक्षाचा स्ट्राइक रेट ४८.३३% इतका लक्षणीय व उल्लेखनीय आहे. पक्षाचे संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आप महाराष्ट्रच्या या अभूतपूर्व प्रारंभाचे कौतुक केले आहे.
अशा भरघोस स्ट्राईक रेट सह ग्रामीण महाराष्ट्रातील ग्राम पंचायत निवडणुकी च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात पदार्पण करणाऱ्या नव्या दमाच्या “आप” पक्षाने हा अभूतपूर्व इतिहास घडविला. आज प्रत्येकाला हे ठाऊक आहे की अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात नवे आदर्श मॉडेल साकारले असून प्रत्येक भारतीयाची इच्छा आहे की दिल्ली मॉडेल त्यांच्या घरापर्यंत पोहोचल पाहिजे. म्हणूनच राजकीय पक्षांच्या सदस्यांनी पैशांचा, बल शक्तीचा आणि जनतेमध्ये जात व धर्माचे राजकारण करून दुही माजवण्याचा व्यापक प्रयत्न करूनही “आप”‘ ने बाजी मारली. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती स्पष्टपणे अस्थिर असून आम आदमी पार्टी राज्यात पुन्हा मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येत आहे.
पक्षाचे जिल्हानिहाय निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
हिंगोली ११
लातूर ५
जालना ४
सोलापूर ११
गडचिरोली २९
नागपूर ६
वाशिम १
यवतमाळ ४१
बुलढाणा १८
चंद्रपूर १०
भंडारा ३
पालघर २
नाशिक १
अहमदनगर ३
एकूण – १४५
पॅनेल:
गाव दापक्याळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर.
गाव बेटेक, तालुका कोर्ची, जिल्हा गडचिरोली
गाव मारोरा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली
निकालाकडे बारकाईने पाहिले तर मंडळाच्या आम आदमी पक्षाला तळागाळातील जनतेने पाठिंबा दर्शविला आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की पक्षाने राज्यातील सर्व भागात भरीव कार्ये केली आहेत आणि आपच्या वाढीचा प्रसार मोठ्या प्रमाणात महिलांनी केला आहे कारण आप मधील महिला नेत्यांचे जनमानसात स्थान असून ते केवळ डमी उमेदवार नसून सक्षम उमेदवार आहेत. विशेष म्हणजे विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झालेल्या या विदर्भातील जिल्ह्याने “आप” ने ४१ विजयी जागांचे योगदान दिले.
“ग्रामपंचायतीचे निकाल असे दर्शवितो की महाराष्ट्रातील लोक पारंपारिक राजकीय पक्षांना म्हणजेच कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजपा यांना पूर्णपणे कंटाळले असून, राज्यात हेच पक्ष आलटून पालटून राज्य करतात, परंतु त्यांचा सर्वसामान्यांना काहीच फायदा होत नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सर्वांगीण विकास आणि सुशासन याचे मॉडेल हे महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आशेचा किरण बनला आहे.
आप नेत्या प्रिती शर्मा मेनन म्हणाल्या…
“या वर्षी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका लढवून पक्ष पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे आणि आम आदमी पार्टी महाराष्ट्रात वाढत जाणारा एक पक्ष असल्याने आम्ही जनतेला आमच्या पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.”