56 इंचाची छाती आता कुठे गेली-गुलाम नबी आझाद
पाकिस्तान महिन्यात दहाव्यांदा आगळीक काढली असून यावेळी सर्वात मोठे शस्र संधीचे उल्लंघन करण्यात आले आहे सीमेजवळ अरनिया सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून रात्री दीड वाजेपासून सलग फायरिंग सुरू आहे. तसेच यावेळी पाककडून ग्रेनेड हल्लाही करण्यात आला. यात झोपलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि एका 13 वर्षांच्या मुलीचाही समावेश आहे. 2003 च्या शस्त्रसंधीनंतर हे सर्वात मोठे उल्लंघन असल्याचे एका अधिका-याचे म्हणणे आहे.यावर 56 इंचाची छाती आता कुठे गेली? असा संतप्त सवाल गुलाम नबी आझादयांनी आहे
दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी या प्रकरणी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतात आता पूर्वीसारखी परिस्थिती नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. तर काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. 56 इंचाची छाती आता कुठे गेली माहिती नाही. आता कोणी नजरेला नजर भिडवून बोलतही नाही, असे काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद म्हणाले.
लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, पुंछमध्ये पाकिस्तानी जवानांनी सकाळी सुमारे आठ वाजता फायरिंग सुरू केली. सुमारे अर्धा तास दोन्ही बाजुंनी गोळीबार झाला. फायरिंग बंद झाल्यानंतर जवानांनी नियंत्रण रेषेच्या जवळ गस्तही घातला. त्यात दहशतवाद्यांच्या घुसखोरीबाबत काहीही पुरावे मिळालेले नाहीत. भाजपने पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारावर टीका केली आहे. सीमेवर पाकिस्तानला काय उत्तर द्यायचे, याचा निर्णय घेण्याचे अधिकार लष्काराला असल्याचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद म्हणाले आहेत. निवारी मुशर्रफ यांनी दिलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना प्रसाद म्हणाले की, मुशर्रफ यांना पाकिस्तानमध्ये कोणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्यांना गांभीर्याने घेण्याची काहीही गरज नसल्याचे ते म्हणाले आहेत. भारताकडून नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन योग्य नसल्याचे मुशर्रफ म्हणाले होते. भारताने पाकिस्तानच्या सहनशीलतेचा अंत पाहू नये असे मुशर्रफ म्हणाले होते.