बजरंगी भाईजान बद्दल कोणीही अफवा पसरवू नये असे सलमान खान ला वाटते आहे . यासाठी म्हणून त्याने आज पोलिसात तक्रार हि दिली आहे . खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचा मित्र असा हि परिचय असलेल्या सलमान ला उगाचच कोणी अडचणीत हि आणू नये असेही सांगितले जाते अर्थात आता मोदींनाही सलमान बद्दल कळवळा असण्याचे कारण नाही म्हणा-मोदींच्या भेट प्रकरणातून त्याला मुस्लीमांपासून तोडण्याचा प्रयत्न झालेले विसरता येणार नाही.आता मुद्दा हा आहे कि ,आपल्या आगामी चित्रपटाविषयी काही जण उगाचच अफवा पसरवून आपल्या चाहत्यांमध्ये फुट पडण्याचा प्रयत्न करीतअसल्याचा आरोप सलमान खान ने केल्याचे वृत्त आहे. शिवाय या प्रकरणी थेट मुंबई पोलिसांकडे तक्रार दिली.आपले चाहते हे सर्वच धर्मातील नागरिक आहेत .‘‘ एमआयएमचे नेते ओवैसी आणि त्यांच्या कट्टर समर्थकांच्या समर्थनाशिवाय ‘बजरंगी भाईजान‘ हा आगामी चित्रपट हिट होईल असे तो सांगतो आहे , आणि या चित्रपटाचे ‘खान भाईजान‘ हे नाव बदलून ‘बजरंगी भाईजान‘ ठेवण्यात आले, असे वक्तव्य आपण केल्याचा खोटा संदेश सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे’’, असा आरोप त्याने तक्रारीत केला. या तक्रारीची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिस प्रवक्ते तथा उपायुक्त (गुन्हे) धनंजय कुलकर्णी यांनीदिल्याचे वृत्त आहे .