आचार संहिता लागू झाल्यावर मतदारांना प्रलोभन दाखविणारे शासन निर्णय धूळफेक
मुंबई-आचारसंहिता लागू झाल्यानंतरही महायुती सरकारने दीडशेहून अधिक शासकीय आदेश (जीआर) जारी केले. त्यावर आयोगाने कारवाईचे आदेश दिले आहेत.
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम बुधवारी म्हणाले की मंगळवारी दुपारी ३.३० वाजेनंतर निघालेल्या जीआरची मािहती राज्य निवडणूक अधिकारी कार्यालय माहिती संबंधित विभागाकडून घेईल. ज्या सॉफ्टवेअरद्वारे सर्व जीआर जारी केले जातात त्यावर जारी करण्याची वेळ नमूद केलेली असते. दुपारी ३.३० नंतर किती जीआर जारी करण्यात आले आणि ते कोणते जीआर होते याबाबत आम्ही संबंधित विभागाकडून संपूर्ण माहिती घेणार आहोत आणि आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासन आदेश निघाले असतील तर त्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल.

