पुणे- राष्ट्रवादीच्या नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी वनमंत्री दत्ता भरणे यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार तळजाई टेकडीवरून पावसाचे पाणी वेगाने खाली येऊन खालील वस्त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या टेकडीवर पाणी अडवा पाणी जिरवा अंतर्गत २ तळी आणि काही बांध घालण्याच्या कामाला आज सुरुवात करण्यात आल्याची माहिती नितीन कदम यांनी दिली .
ते म्हणाले,’मागील काही वर्षी पावसाळ्यामध्ये सहकार नंबर -२ येथील स्वानंद, सावरकर, क्रांती, क्षितिज,भोसले पार्क सोसायटी, सिंहगड रोड हिंगणे, खोराड वस्ती परिसरामध्ये तळजाई टेकडी वरून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे वारंवार पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे अतोनात नुकसान होत आले आहे. त्याकारणास्तव १५ एप्रिल रोजी वनमंत्री दत्तामामा भरणे यांना फोन करून सर्व विषयाची सविस्तर माहिती दिली,सोलापूरचे पालकमंत्री असल्यामुळे ते सोलापूर मध्ये होते, पण फोनवरील चर्चेनुसार तातडीने समस्या सोडवितो असे सांगून त्यांनी पुणे शहराचे वनविभागाचे DCF राहुल पाटील यांना फोन केला व पुढील अवघ्या १५ मिनिटांत मला RFO दिपक पवार यांचा फोन आला व १ तासात प्रत्यक्ष स्थळी त्यांच्या संपूर्ण टीम सोबत ते आले.
डॉ. अनंत भागवत, अविनाश सुर्वे, नितीन वाघ, अभय सोमण या स्थानिक नागरिकांसमवेत सर्व अधिकारी वर्गासोबत त्याठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व समस्या व परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून देऊन पुढील २ दिवसांत काम चालू करतो असे सांगितले. याप्रसंगी मागील पुरामध्ये सौ. अतीतकर या ज्येष्ठ नागरिक आजी या भिंत पडून मृत्युमुखी पावल्या हि बाबही त्यांना सांगितली.
या सर्व महत्त्वपूर्ण बाबी लक्षात घेऊन बोलल्याप्रमाणे पुढील दोन दिवसात वनविभागाकडून कामाची प्रत्यक्ष सुरुवात झाली व त्याप्रमाणे योग्य उपाययोजना म्हणून मोठी दोन तळी व ठिकठिकाणी बांध घालण्याची कामे सुरु झाली आहेत, जेणेकरून पावसाचे पाणी हे टेकडीवरच साठून पाणी जिरवण्यासही मदत होईल, पावसाचे पाणी 10 ते 20 टक्के खाली वाहून जाईल आणि पावसामुळे सोसायटीची जी भिंत पडली होती ती भिंतही वनविभागाच्यातर्फे बांधण्यात येणार आहे. यासर्व तत्पर कामामुळे भविष्यात सहकार नं-२ मधील स्वानंद, सावरकर, क्रांती, क्षितिज, भोसले पार्क सोसायटी परिसरामधील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल याचे समाधान आहे.