पुणे – सध्या ताणतणाव वाढत आहेत. आपल्यासाठी मोबाइल आला पण त्यानेही वाढवले फक्त टेन्शनच ! कोणाचा मोबाईल आला तरी टेन्शन अन नाही आला तरी टेन्शन……नेटवर्कच नाहेचे. त्यात सोशल मिडिया नावाच्या एक नवा प्रकार लोकप्रिय झालाय पण त्यावरही आलेले अनेक संदेश टेन्शन वाढवण्यात भरच टाकत असतात. एकूण काय तर कितीही सोयी सुविधा असल्या तरी रोजच्या जीवनातले टेन्शन कमी होण्याऐवजी वाढतच आहे. हे टेन्शन कमी करण्याचा एकमेव अन बिना खर्चाचा एकमेव मार्ग म्हणजे हसणे…..हसणे हा जसा आनंद देणारा आहे तसाच तो मनाची मशगत करून आयुष्य निरामय करणार प्रकार आहे. हसणे ही केवळ एक प्रक्रिया नाही तर तो शास्त्रिय (सायन्टेफिक) प्रकार आहे, अशा शब्दात रोजच्या जीवनात हसण्याचे महत्व आज
३४ व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये हयासदान फाऊंडेशनने हास्योत्सव एकपात्रींचा हा कार्यक्रम आयोजित केला होता. बालगंधर्व रंगमंदीरात झालेल्या या कार्यक्रमात पुणे फेस्टिव्हलचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी कार्यक्रम आयोजित करणा-या मकरंद टिल्लू, मंजिरी धामणकर, चैताली माजगावकर – भंडारी, दिलीप हल्याळ आणि महेंद्र गणपुले या हास्यवीरांचा सन्मान केला आणि कार्यक्रमाचा आनंदही घेतला. यावेळी फेस्टिव्हलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, मुख्यसंयोजक डॉ. सतीश देसाई, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख मोहन टिल्लू, श्रीकांत कांबळे. यावेळी उपस्थित होते. बाहेर जोरात पाऊस कोसळत असतानाही बालगंधर्व रंगमंदीरात हास्यप्रेमीनी गर्दी करून हास्याची कारंजी उडवली.
कार्यक्रमासाठी कलमाडींची एन्ट्री झाल्यावर सर्व कलाकारांनी त्यांना व्यासपीठावर आमंत्रित करून त्यांचे विविध हास्य प्रकारांनी स्वागत केले. पुणे फेस्टिव्हमध्ये सतरा वर्षापूर्वी कलमाडी यांनी एकपात्री कलाकारांना संधी दिल्यामुळे आज महाराष्ट्रातील सर्व एकपात्री कलाकार एकत्र आले आहे असे नमूद केले. कार्यक्रम सादर करणारी चैताली माजगावकर – भंडारी हीने पुणे फेस्टिव्हलमध्ये झालेली पहिली हास्यकलाकार स्पर्धा जिंकल्यानंतर तिने एकपात्री कलाकार म्हणून करीयर करण्याचा निर्णय घेतला अशी महिती मोहन टिल्लू यांनी दिली.
कार्यक्रमाची सुरूवात मकरंद टिल्लू यांनी पापड असो की माणसं पावसळ्यात कोमजतातच, पण कार्यक्रमाला गर्दी महत्वाची नसते तर दर्दी महत्वाचे असतात असे सांगून पहिलीच टाळी घेतली, हसणे हा केवळ एक प्रकार नाही तर हसणे हा शास्त्रशुद्ध (सायन्टेफिक) प्रकार असल्याचे सांगितले. मंजिरी धामणकर यांनी सूत्रसंचलनाची सूत्रे घेतानाच ‘तुम्हारे घर कि शान न जाती की रूदबा कम हो जाता, जो गुस्से कहाँ तुमने वो हसके कह जाता.’असा शेर ऐकवत सुरूवात केली. हास्य ही फक्त माणसालच मिळालेली दैवी देणगी असल्याचे स्पष्ट करताना प्राण्यांना कधी हसताना बघितले का ? जर प्राणीही हसू शकले असते तर…? असा मिश्किल प्रश्न केला. त्यानंतर त्यांनी काही किस्से सांगितले.
आपल्या सनी बरोबर चैताली माजगावकर हिने थेट प्रक्षागृहातून एन्ट्री केली. तिने रामदास पाध्येंसारखी शब्दभ्रम ही कला अवगत केली आहे. सनी सोबत तिने गप्पा मारल्या अन सर्वांनाच पाध्येंच्या बोलक्या बाहुल्यांची आठवण झाली. त्यात तिने सनीच्या तोंडी घातलेले बीपी म्हणजे काय ? बी पी म्हणजे बावळटपणा अन सीए म्हणजे कम्प्लिट आराम या कोट्यांनी हसण्याचे फवारे वाढायला लागले. यानंतर फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक डॉ. सतीश देसाई यांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत मदर टेरेसा, नरेंद्र मोदी, अमिताबबच्चन, दिलीपकुमार, हेमामालिनी ते ललिता पवार यांच्यापर्यंत अनेकांचे त्यांनी घेतलेले अनुभव सांगून आपण अशा माणसांकडून काय शिकायचे अन कसे शिकायचे हे नमूद केले.
दिलीप हल्याळ यांनी करोनाचा चॅप्टर सर्वांनी विसरून जावा यासाठी आपण बंपर लाफ्टर घेऊन आलो आहे असे सांगून पहिल्या वाक्यापासून रसिकांची दाद मिळवली. अनेक विनोद रोजच्या जीवनात आपल्या आजूबाजूला घडत असतात. ते कसे टिपायचे याचे रोजच्या जीवनातील अनेक दाखले त्यांनी दिले. एक ज्येष्ठ नागरीकांचा मोबाईल फोनबद्दलचा अनुभव कथन केला. वय वाढले की म्हतारपण येतेच पण त्यांना म्हतारे म्हणू नका कारण ते महा…तारे असतात असा संदेश देत एखादे मूल दत्तक घेण्याऐवजी आजीआजोबांना दत्तक घ्या असे सांगून सर्वांनाच एका वास्तव्याची जाणिव करून दिली. हिंदी चित्रपटातील गाणी कशी आणि किती निरर्थक असतात याचे अनेक दाखले महेंद्र गणपुले यांनी दिले. तसेच विविध प्रकारचे तोंडाने आवाज काढून दाखवले.