महापालिकेची, पोलिसांची जबाबदारी आहेच आणि नागरिकांची जबाबदारी नाही ?वाहतूक कोंडीचा विषय.
पुणे – सरका,सरका जेवढे पुढे सरकता येईल तेवढे,बळकवा,बळकावा जेवढी जागा बळकावता येईल तेवढी हि प्रवृत्ती रस्त्याच्या रुंदीला अपुरी करत असल्याचे संपूर्ण पुणे शहराच्या हद्दीत बहुसंख्य ठिकाणी राबविलेली दिसते आहे. हॉटेल असो,व्यापारी दुकाने असो वा घरे असो…रस्त्यावर ओसंडून वाहत असतात आणि मग उरल्या सुरल्या रस्त्यावर पदपथ मग त्यापुढे पार्किंग आणि मग गळा दाबून धरलेल्या रस्त्यावरून सुरु होणारी वाहतूक असे चित्र बहुताशी सगळीकडेच दिसते.मुळातच असे चित्र असताना नको असलेले सायकल मार्गिका,बीआरटी लेन या साऱ्यातून जे बहु अंशी संख्येने आहेत अशा वाहनांना मार्ग काढीत मुसंडी मारावी लागते.महापालिकेच्या वारंवार वाढणाऱ्या हद्दी, वाढती वाहने आणि रस्त्यांच्या रुंदी यांचा कधी मेळ कोणी घातलाच नाही.आणि आता रस्त्यावरची वाहतूक कोंडी हाच सर्वात मोठा यक्ष प्रश्न होऊन बसला आहे.ज्यास पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी महापालिकेवर लेटर अस्त्र डागाळीत वाचा फोडली आहे.
हि बाब सर्वात आधी बाणेर मध्ये गंभीरपणे घेतली गेली आहे. युवराज देशमुख या बांधकाम विभागातील अधिकाऱ्याने येथे आपली धडक मोहीम सुरु केली आहे. कार्यकारी अभियंता श्रीकांत वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उप अभियंता जे.बी. पवार, कनिष्ठ अभियंता संग्राम पाटील, कनिष्ठ अभियंता संदेश कुळवमोडे, कनिष्ठ अभियंता गंगाप्रसाद दंडीमे यांनी सुरु केलेल्या कारवाईची आज चौथा दिवस सुरु आहे.अर्थात कुठे ३ मजल्याची बांधकाम परवानगी असताना कोणी ४ /५ मजले बांधून इमारती उभ्या केल्या असतील तर तिथेही या विभागाला लक्ष पुरवावे लागणार आहे.
इमारतीच्या अगर कुठल्याही बांधकामांच्या फ्रंट,साईड मार्जिन असतात तरी कशाला ? याचा विचार न करता या जागांचा व्यावसायिक/ अव्यावसायिक वापर करणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर /अतिक्रमणांवर यांनी हाथोडा टाकण्याचे काम सुरु केले आहे. ज्या त्या इमारतीत येणारी वाहने या फ्रंट,साईड मार्जिन मध्ये उभी राहू शकतील ती रस्त्यावर येणार नाहीत या दृष्टीने आणि आपदकाळात योग्य ती सुविधा देण्याच्या दृष्टीने हि स्पेस सोडलेली असते.परंतु या बळकावून त्याही पुढे रस्त्यावर पुढे सरकून जागा बळकाविण्याची वृत्ती फोफावल्याने या जागेत उभी करता येणारी वाहने रस्त्यावर उभी राहू लागली, हि वाहने उभी करण्यासाठी भांडणे,हाणामाऱ्या झाल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत.
आता अशा प्रत्येक फ्रंट,साईड मार्जिन मधील आणि टेरेस वरील देखील अनधिकृत बांधकामानवर महापालिकेची वक्रदृष्टी पडली आहे. बाणेर मधून झालेली सुरुवात संपूर्ण महापालिका हद्दीत पूर्ण वेगाने आणि जोशाने राबविली गेली. आणि तिचे दर ३ महिन्यांनी सातत्य ठेवले तर वाहतूक कोंडीने गुदमरलेला श्वास बऱ्याच प्रमाणात मोकळा होण्यास मदत निश्चित होईल असे स्पष्ट दिसते आहे.