पुणे- गेली चार वर्षे पुणे महापालिकेत भाजपची एक हाथी सत्ता आहे. पण महापालिकेचा कारभार हाताळताना विशिष्ट मंडळीनांच डोळ्यापुढे ठेऊन कारभार होत असल्याची टीका अजूनही भाजपच्या वर्तुळात होतेच आहे. आता २०२२ ला महापालिका निवडणुका आहेत . आजवर एकाच नगरसेवकावर पक्षाने खूपच कृपा दृष्टी ठेवल्याचे साऱ्यांचेच मत आहे. या कृपा दृष्टीचा वापर त्यांनी जनहितासाठी लागणारे ,पक्ष बळकटी साठी लागणारे कार्यकर्ते सांभाळण्यासाठी केला किंवा नाही हा विषय आता घेणार नाहीचं … पण ‘ हा’, ज्येष्ठ, ‘त्याचे’ योगदान मोठे , अजूनही सावरतोय तो, सर्वांनाच … असे सांगत असा यांनी काय केला गुन्हा ..म्हणत यांना का महापौर पद दिले जात नाही .. ? असा सवाल केला जातो आहे. आता अखेरचे वर्ष आहे, नेत्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर महापालिका निवडणुकीत कठीण प्रसंग येऊ शकतात ..अशी भाजपच्या .अनेक नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा झड़तेआहे . कॉंग्रेस मधून भाजपा तआलेले निराश तर आहेतच .पण भाजप कडून निवडून आलेल्यांपैकी सुमारे ८० टक्के नगरसेवक पदाधिकार्यांच्या कारभाराबाबत नाराज आहेत .
आता भिमाले महापौर का होऊ शकत नाहीत ? वर्षा तापकीर यांनी किती वर्षे महापौर पदासाठी प्रतीक्षा करायची . दीपक पोटे , अमोल बालवडकर सारखी तरुण मंडळी महपौर का होऊ शकत नाहीत ? एवढेच काय जर पूर्वीचे स्थायी अध्यक्ष महापौर होऊ शकतात तर सध्याचे स्थायी अध्यक्ष ज्यांनी कोरोना काळात हि उत्तम कामगिरी करून दाखविली ते महापौर का होऊ शकत नाहीत असा हि कार्यकर्त्यांचा सवाल आहे. राणी भोसलेंच्या समर्थकांकडून देखील त्यांना चांगले पद मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय .दिलीप वेडे पाटील ,उमेश गायकवाड, आदित्य माळवे उपमहापौर का होऊ शकत नाहीत ? असे देखील प्रश्न त्यांचे कार्यकर्ते विचारत आहेत .मात्र यातील कुठलाही नगरसेवक अशा पदांसाठी स्वतःहून पुढे येऊन इछ्या देखील व्यक्त करताना दिसत नाही हे भाजपचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल .
जनसामन्यात मिसळणारे , त्यांना भूलथापा न देणारे , प्रत्यक्षात दिलेली आश्वासने पूर्ण करणाऱ्या नगरसेवकांना आता अखेरच्या वर्षात तरी जनतेची कामे वेगाने मार्गी लावण्याची शक्ती अशा पदां द्वारे मिळेल काय ? असा कार्यकर्त्यांचा सवाल आहे.