पुणे । माजी नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांची संपूर्ण अनकट पत्रकार परिषद.वाघिणीने का सोडले मनसेला …?पुण्यातील ‘कोणत्या’मनसे नेत्यांमुळे त्रास झाला ? त्या कोणाला योग्य वेळी उत्तर देणार? …जास्त वेळ बोलले तर मी भावनिक होईल ..आणि .. असे का म्हटल्या रुपाली पाटील ?..१४ वर्षे काम केल्यावरही पक्ष सोडण्याची वेळ का आली ?
”मी माझ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे.. आपण दिलेलं बळ नेहमी संघर्ष करण्याची प्रेरणा देत. यापुढेही आपले आशीर्वाद आणि “श्री.राज ठाकरे” हे नाव ह्रदयात कोरलेले कायम राहिल’ अशी भावना व्यक्त करत रुपाली पाटील यांनी मनसेचा राजीनामा दिला आहे.रुपाली पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. बुधवारी मनसेच्या सदस्याचा आणि सर्व पदांचा राजीनामा दिला असून पक्षातील वरिष्ठ नेत्यांना कारण सांगितले असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले. रुपाली पाटील म्हणाल्या, ”मी पक्षाला नाव ठेवून जाणार नाही, मला राजसाहेब, मनसे कार्यक्रर्त्यांनी मला भरभरुन प्रेम दिलं. मनसे सैनिक खूप भावनिक, जीव लावणारे आहेत, त्यांना ही गोष्ट माहिती आहे. राजकारणात काम करीत असताना चुका होत असतात. मी काही देव नाही, की चुकणार नाही, असे नाही. मी चुकले तर मला समजून घेणारे नेतेही असतात. मनसेतील रिकामटेकड्या नेत्यामुळे मी जात आहे. याबाबत मला वाद घालायचा नाही. प्रत्येक पक्षाची ध्येय धोरणं असतात. मी ज्या पक्षात जाईल त्या पक्षाच्या ध्येयधोरणानुसार काम करणार आहे. मला लोकांची कामे करायची आहेत,” ”मनसे सोडताना भावनिक होणारच पण शेवटी निर्णय घ्यावा लागणारच होता. रामाच्या वनवासाप्रमाणे माझाही ही चैादा वर्षांचा वनवास संपल्यानंतर मी ‘जय श्रीराम’म्हणून मी पुढे जात आहे. आहे. मी कुठल्याही पक्षात गेले तरी माझी शैली तीच राहिल, तुम्हाला तिचं रुपाली पाटील दिसेल,” असे त्या म्हणाल्या. ”माझ्या मनात कुठेही कुटता नाही. राज ठाकरे माझे दैवत आहेत,” असे रुपाली पाटील म्हणाल्या”मनसे अध्यक्ष राज ठाकरे कायम ह्रदयात राहतील मनसेतून बाहेर पडल्यानंतर सध्या दोन राजकीय पक्षांकडून ऑफर देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत भूमिका जाहीर करणार असल्याचे रुपाली पाटील यांनी सांगितले.उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शिवसेनेचे नेते वरुण देसाई यांना काल मी मुंबई भेटले. मात्र पक्ष प्रवेशाबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे रूपाली पाटील यांनी सांगितले. पक्षाने मला सन्मान आणि पदे दिली , त्यामुळे मला काय दिले नाही हा माझा वादाचा मुद्दाच नाही, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.
रुपाली पाटील यांची पुण्यात मनसेच्या आक्रमक नेत्या आणि डॅशिंग नेत्या म्हणून ओळख होती. महिला, युवक-युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष कामं केली. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला आहे.याआधी त्यांनी पुणे महापालिकेत त्या माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षापदही भुषावले होते. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा रुपाली पाटील यांनी लढवली होती. पण, यात त्यांचा पराभव झाला.