मेट्रोच्या कामाला कुठलाही विलंब न होता लकडी पुलावर होऊ शकेल अत्याधुनिक लिफ्टिंग ब्रिज
पुणे- लकडी पुलावरील मेट्रोचा पूल विसर्जन मिरवणुकीला अडथळा येणार नाही अशा पद्धतीने करण्यात येईल अशी भूमिका मेट्रो आणि पुण्याचे महापौर यांनी घेतली असून यामुळे गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जातोय ,परंपरा राखली जातेय असे चित्र निर्माण झाले आहे. मात्र येथील पुलात होणाऱ्या बदलामुळे मेट्रोचे काम रखडल्याचा आरोप चुकीचा असून अशा चुकीच्या प्रचाराला कोणी बळी पडू नये असे आवाहन कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी केले आहे.गणेश विसर्जन मिरवणूकीची परंपरा महत्वाची आहेच, मेट्रो शहरात आणणे हि आम्हास भूषणावह आहेच पण त्या साठी गणेश मंडळ कार्यकर्त्यांची भावना दुखावण्याचा प्रयत्न होऊ नये , कोणी जर मंडळाच्या मिरवणूक रथांची उंची कमी करा म्हणत असेल तर ते शक्य होणार नाही याबाबत गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका बरोबरच आहे. मंडळ कार्यकर्ते यांची भावना ,मिरवणूक रथांची भव्यता आणि परंपरा याबरोबर मेट्रोचे ही विलंब न करता , किंवा अडथळा ना येता काम सुरु राहावे या साठी आपण मंडळ कार्यकर्त्यांच्या समवेत राहून महापौरांच्या सहकार्याने मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून लाकडी पुलावर असलेला मेट्रोचा पुल विसर्जन मिरवणूक येईल तेव्हा वरच्या बाजूला उंचावर सरकेल मिरवणूक जाईल तेव्हा पुन्हा पूर्ववत होईल या दृष्टीने आराखडा करण्याची कल्पना सुचविली आहे. याबाबत ,कार्यकर्त्यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावल्याने आणि महापौरांनी साथ दिल्याने आता लाकडी पुलावरील मेट्रोच्या पुलात लवकरच बदल होऊ शकेल या दृष्टीने मेट्रोने हालचाली सुरु केल्या आहेत . मात्र यामुळे मेट्रो होण्यास उशीर होईल अशा प्रकारच्या चुकीच्या प्रचाराला कोणी बळी पडू नये असेही आबा बागुल म्हणाले आहेत.या संदर्भात आता माध्यमातून काउंटर बातम्यांचा ट्रेंड काहिनी सुरु केल्याच्या पार्श्वभूमीवर आज ‘माय मराठी ‘ ने आबा बागुल यांची भेट घेतली . आणि त्यांचे म्हणणे पुन्हा एकदा जाणून घेतले … पहा नेमके यावेळी आबा बागुल काय म्हणाले …