पुणे : आम्ही अमेठी जिंकू शकतो,तर बारामती का नाही असा पवित्रा आज येथे भाजपचे नेते आमदार राम शिंदे पत्रकार परिषदेतून व्यक्त केला आहे,केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन येण्याच्या आधी सुप्रिया सुळे घाबरल्या,त्या येणार म्हणून घरोघरी फिरत आहेत, शिवाय हर्षवर्धन पाटील आल्याने आमची ताकद वाढली आहे,हर्षवर्धन पाटील यांचा योग्य सन्मान होईल असेही ते म्हणाले. निर्मला सीतारामन यांची भाषा बारामतीकरांना समजेल का त्या प्रश्नावर राम शिंदे म्हणाले की,,’मी आहे ना,माझी तर अस्सल मराठी भाषा आहे.ती समजेल ना,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती दौर्यावर येत असून बारामती लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे प्रभारी आमदार राम शिंदे यांच्याकडे जबाबदारी आहे. या दौर्याबाबत आयोजित पत्रकार परिषदेत राम शिंदे यांनी अनेक राजकीय प्रश्नावर त्यांनी उत्तर दिली. तर यावेळी राम शिंदे म्हणाले की,कोणाचा तरी बालेकिल्ला वाटत असेल पण आम्ही जो देशात बालेकिल्ला (अमेठी) होता.तो आम्ही खेचून आणला. त्यामुळे हा बालेकिल्ला नाही.आम्ही अमेठी जिंकू शकतो,तर बारामती का नाही अशी भूमिका भाजपचे नेते आमदार राम शिंदे मांडत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला. तर पंरतु कोणी जर असा दावा करीत असेल की, इथे आमचाच बालेकिल्ला आहे आणि आम्हीच जिंकू,तर तो दावा स्पेशल फेल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात.
यावेळी राम शिंदे म्हणाले की,बारामतीचा विकास झालेला नाही. बारामती तालुक्यात अद्यापही ४० गावे पाण्यापासून दूर आहेत. तसेच काही ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानामुळे थोडा फरक पडलेला आहे. रस्त्यांची वाईट अवस्था आहे. या परिस्थितीमध्ये ते विकासाचा दावा करीत आहेत. तो स्पेशल फेल ठरलेला असून कोणत्या पद्धतीच ते राजकारण करतात. यंदाच्या वर्षी आपण स्वातंत्र्याची ७५ वर्ष साजरी करीत असून सर्व सामान्य जनतेला जाऊन विचारले.तर समजेल की,झालेला विकास पाहण्यास येत आहोत की, भकास झालेला पाहण्यास येत आहे. हे येणाऱ्या काळात निश्चित त्यांना कळेल,असा टोला अप्रत्यक्षपणे सुप्रिया सुळे यांना त्यांनी लगावला. तसेच ते पुढे म्हणाले की,मागील अडीच वर्षात स्वतः च्या मतदार संघात फिरल्या नाहीत. पण आता निर्मला सीतारामन येणार असे समजताच घरोघरी जाऊन फिरत आहे. त्यामुळे येण्या अगोदर त्या घाबरल्या आहेत हे स्पष्ट होतं असल्याचे सांगात सुप्रिया सुळे यांच्यावर त्यांनी टीका केली.आता लक्ष बारामती आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या समोर कार्यक्रम ठरलेला आहे. आता आम्ही कार्यक्रम करणार असल्याच त्यांनी सांगितले.