पुणे- एकीकडे पाणी कपात करू नका अशी महापौरांची वक्त्वये माध्यमातून येत असताना गुरुवारी (ता.६) दुपारनंतर खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली. खडकवासला धरणात सुमारे ६१ टक्के पाणीसाठा झाला असून, गुरुवारी दुपारपर्यंत धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे पाणी सोडावे लागणार आहे.धरणाची क्षमता १.९७ टीएमसी इतकी आहे. खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात बुधवारी दिवसभरात चांगला पाऊस झाला. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात १२ मिलिमीटर, पानशेत ५४ मिमी, वरसगाव ५५ मिमी आणि टेमघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ४० मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे दिवसभरात धरणातील पाणीसाठ्यात काही प्रमाणात वाढ झाली आहे.