राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मुंबई वगळता इतर सर्व महानगरपालिकांमध्ये ३ सदस्य प्रभाग पद्धतीने निवडणूक घेण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला अतिशय चांगला निर्णय आहे. युती सरकारने ४ चा प्रभाग केला होता पण ४ च्या प्रभागांमध्ये भौगोलिक अंतर फार मोठे होते, त्यामुळे नागरिकांशी संपर्क करणं हे नगरसेवकांना देखील कठीण होत होतं, आणि नागरिकांना देखील नगरसेवकांच्या संपर्कात राहणे कठीण होते, त्याचप्रमाणे ४ नगरसेवक त्यामुळे विकास कामाचे श्रेय कोणी घ्यायचं याबद्दल देखील अनेक वेळा वाद निर्माण झालेले आपण पाहिले. सुप्रीम कोर्टाने ओबीसीचे आरक्षण रद्द केलं त्याचा अंतीम निर्णय अजून झाला नाही म्हणून कदाचित एक महिला, एक खुला, आणि एक सर्व पक्षांनी मिळून समजुतीने ओबीसी साठी जागा असं कदाचित मंत्रिमंडळामध्ये चर्चा झाल्याची शक्यता असेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १ काय,२ काय, ३ काय झाला तरी निवडणुकीसाठी सज्ज झालेला आहे. गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षाने पुणे शहराचा ज्या पद्धतीने कारभार केला मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केला आणि विकासापासून पुणे शहर दूर ठेवले त्यांना पुणेकर निश्चितच या निवडणुकीमध्ये दूर केल्याशिवाय राहणार नाहीत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे महानगरपालिकेमध्ये निश्चित सत्तेमध्ये येईल.
अंकुश काकडे
प्रदेश प्रवक्ता NCP