पुणे- कॉंग्रेस भवन च्या आवारात बेकायदा घुसून तोडफोड करण्याचा प्रयत्न करत कॉंग्रेसच्या फलकाची नासधूस करत गलिच्छ आरडाओरडा करत दहशत निर्माण करू पाहणाऱ्या भाजयुमो च्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली नाही तर शिवाजीनगर पोलिसांना कॉंग्रेसच्या उग्र आंदोलनाला सामोरे जावे लागेल असा इशारा आज येथे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी दिला आहे.
शुक्रवार दि. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी काँग्रेस भवनवर भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या हल्ल्याबाबत आज पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अरविंद माने यांची भेट घेऊन हल्लेखोरांवर योग्य कारवाई करावी यासाठी पत्र देण्यात आले.
यावेळी बोलताना शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘भारत जोडा यात्रेमध्ये काँग्रेस नेते खा. राहुलजी गांधी यांनी सावरकरांबद्दल काही तथ्य मांडली याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे पुणे शहर अध्यक्ष बापू मानकर व त्यांच्या साथीदारांनी पूर्व नियोजित कट करून बेकायदेशिररित्या काँग्रेस भवन या खाजगी वास्तूमध्ये प्रवेश करून नुकसान केले आहे. याबाबत योग्य ती कारवाई करण्यात आली नसून कलम ४२७ व ४५२ हे न लावता त्यांना किरकोळ गुन्हा दाखल करून सोडून देण्यात आले आहे. पुणे शहर काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते भारत जोडो यात्रेसाठी शेगावला गेले होते. पुणे शहरात असा प्रकार घडणे योग्य नसून संबंधितांवर योग्य कारवाई झाली नाही तर शिवाजीनगर पोलीस स्टेशनवर धरणे आंदोलन करण्यात येईल याची दखल घ्यावी.’’
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे चिटणीस संजय बालगुडे, रविंद्र धंगेकर, मनीष आनंद, रफिक शेख, अजित दरेकर, संगीता तिवारी, बाळासाहेब दाभेकर, सोनाली मारणे, मेहबुब नदाफ, शेखर कपोते, राजेंद्र शिरसाट, सुजित यादव, सचिन आडेकर, विजय खळदकर, रमेश सकट, अजित जाधव, राजेंद्र भुतडा, रमेश सोनकांबळे, सतिश पवार, शिलार रतनगिरी, सुनिल शिंदे, द. स. पोळेकर, संदिप मोरे, सौरभ अमराळे, शिवराज भोकरे, संजय खडसे, अक्षय माने, हेमंत राजभोज, रोहन सुरवसे, रवि आरडे, राहुल तायडे, बंडू नलावडे, राजू साठे, वैशाली रेड्डी, ज्योती परदेशी, रेखा घलोत, प्राची दुधाणे, छाया जाधव, विकी खन्ना, अरूण वाघमारे, इंद्रजीत भालेराव, दिलीप लोळगे, लतेंद्र भिंगारे, फैय्याज शेख, संदिप मोरे, विनोद रणपिसे, अजय खुडे, अविनाश अडसूळ, भगवान कडू आदीसह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.