पुणे : भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे कष्टकरी आणि मध्यमवर्गीय यांच्या मनात भवितव्या विषयी धास्ती निर्माण झाली आहे,अशी टीका कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि मित्र पक्ष आघाडीचे उमेदवार अरविंद शिंदे यांनी केली.
कसबा विधानसभा मतदारसंघात अरविंद शिंदे यांनी कोपरा सभा घेतल्या. चुकीच्या अर्थकारणाने बांधकाम क्षेत्रातील मजूर, सप्लायर यांच्या रोजगारावर गंडांतर आले आहे, पुण्याच्या एमआयडीसीतील भनेक कारखाने बंद पडल्याने त्यावर अवलंबून असलेला कष्टकरी अक्षरश : पिचला आहे, औद्योगिक क्षेत्रातील अधिकारीसुद्धा नोकरी बाबत धास्तावलेले आहेत. प्रचाराच्या निमित्ताने मतदारांशी संपर्क साधला तेव्हा आर्थिक संकटाबद्दल लोकांनी चिंता व्यक्त केली, असे शिंदे यांनी सांगितले. जागतिक मंदीच्या काळात मनमोहनसिंग पंतप्रधान असताना त्यांनी धीराने परिस्थिती हाताळली आणि देशातील गरीबाला मंदीची झळ बसू दिली नाही, असे शिंदे म्हणाले.
कोपरा सभांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. सभांना गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये याकरिता कार्यकर्त्यांनी दक्षता घेतली. गंजपेठेतील मासे आळी येथे झालेल्या सभेत वीरेंद्र किराड , अजित दरेकर, महेश शिंदे , आदींची भाषणे झाली. राज्य सरकारने पुण्याच्या विकासाचे एकही नवे ठोस काम केलेले नाही अशी टीका वक्त्यांनी केली
,गंज पेठ परिसरातून शुक्रवारी पदयात्रा काढण्यात आली. यामध्ये विरेंद्र किराड, वनराज आंदेकर, अजित दरेकर, कमलताई व्यवहारे,शांतीलाल मिसाळ, दयानंद अडागळे, बाळासाहेब मोरे, शकील शेख, आयुब पठाण, राजू नामेकर, उमेश काची विनय ढेरे, शिल्पा भोसले, मनीषा नेवसे, सारीका पारेख, सारीका जाधव, सुशिला गुंजाळ आदी सहभागी होते