पुणे-कोरोनामुळे आलेल्या लॉकडाउनने रोजगार गेल्याने नैराश्य वाढले असून आत्महत्यांचे प्रकार दुपटीने वाढले आहेत, एकीकडे कोरोना बाधित होण्याचा वेग 30 दिवसांनी दुप्पटी वर आला आहे, हळू हळू उद्योग व्यवसाय सुरु झाले असले तरी उद्योजक, व्यवसायिक यांनी या निमित्ताने कामगार कपातीचे मोठे षड्यंत्र सुरु केले आहे, ज्याकडे शासनाने अद्याप ढूंकूनही लक्ष दिलेले नाही, अगदी वृत्तपत्र क्षेत्रापासून सर्वच क्षेत्रात कोरोना च्या लॉकडाउन स्थितिचा ग़ैरफ़ायदा घेत कामगार कपात मोठ्या प्रकारावर सुरु आहे. ज्या कामगारांच्या जीवावर वर्षानुवर्षे करोडों ची माया जमविली ते या 3 महिन्यात ढासळल्याचा आव आणित कामगारांना बिनधास्त बेरोजगारी च्या खाइत ढकलत आहेत. मात्र सरकारी पातळीवर याबाबत पूर्णतः अनास्था आहे, कामगार यूनियन्स, नेते, चळवळी मालकशाही च्या बटिक झाल्याचे चित्र आहे. त्यात लॉबी, कंपू शाही, जातीयवाद अशी स्थिति स्पष्ट असल्याने यापुढे आत्महत्या आणखी वाढन्याची मोठी भीति आहे.
पुणे शहर आणि परिसरात गेल्या ३४ दिवसांमध्ये 68 आत्महत्या प्रकरणातील मृतदेहांचे शव विछेदन ससून मध्ये झाले आहे.ससून रुग्णालयात १५ मे ते १९ जून या ३४ दिवसांमध्ये गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या ६८ जणांचे मृतदेह विच्छेदनासाठी आले. यापूर्वी ससून रुग्णालयाच्या न्यायवैद्यक शास्त्र विभागात दररोज एक याप्रमाणे गळफास घेतलेल्या व्यक्तीचा मृतदेह आणला जात असे
वेगाने बदलणाऱ्या परिस्थितीमुळे येणारे नैराश्य, तसेच बदललेल्या जीवनशैलीतून येणाऱ्या ताणतणावांतूनच आत्महत्येसारख्या घटना घडत असल्याचे निरीक्षण पोलिसांनी नोंदवले आहे. त्यात सर्वाधिक प्रमाण तरुणांचेच असल्याचेही पुढे आले आहे. लॉकडाउनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. छोटे व्यावसायिक, रोजच्या रोज मजुरी करून घर चालविणारे मजूर आर्थिक संकटात सापडले. त्यातून नैराश्य आल्याने काही जणांनी गळफास घेतला असल्याचे निरीक्षण पोलिस अधिकाऱ्यांनी नोंदविले.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मार्च ते मे या काळात सहा आत्महत्या झाल्या. गुरुवारी (ता. १९) मात्र, एकाच दिवसांत चार आत्महत्या उघडकीस आल्या. लॉकडाउनमुळे रोजगार बंद झाला, नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातूनही काही जण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांकडून बोलले जात आहे.