पुणे : कोरोनाचे उपचार खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयात मोफत झालेच पाहीजेत, आतापर्यंत रुग्णांनी भरलेल्या लाखो रुपयांच्या बिलाचा रिफंड मिळालाच पाहिजे, कंटेन्मेंट झोन मधील नागरिकांना घरटी दहा हजार रुपये मिळालेच पाहिजे म्हणून रूग्ण हक्क परिषदेचे संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उमेश चव्हाण यांनी रूग्ण हक्क परिषदेच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांना पत्र लिहून मागण्यांचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र भरातील कार्यकर्त्याना आवाहन केले होते. त्यांच्या अवाहनास पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार प्रतिसाद देत राज्यातील १९ जिल्ह्यातील तब्बल १०६ तालुक्यातून ५ पदाधिकाऱ्यांची किमान सात शिष्टमंडळे तयार करून प्रत्येक तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात रूग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळातही सर्वसामान्य नागरिकांचा आवाज शासनापर्यंत पोहोचविला आहे!!
मंगळवारी २ जून २०२० रोजी एकाच दिवशी १०६ तालुक्यातील तहसीलदार यांना भेटून रूग्ण हक्क परिषदेच्या कार्यकर्त्यांनी नागरिक आणि करोना रुग्णांच्या व्यथा शासनदरबारी मांडल्या यामध्ये महाराष्ट्र राज्यातील १९ जिल्ह्यातून उस्फुर्त प्रतिसाद दिला. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, नाशिक, सांगली, कोल्हापूर, सातारा, जळगाव, बुलढाणा, औरंगाबाद, कोल्हापूर, ठाणे, परभणी, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, रायगड, पालघर, अहमदनगर, बीड जिल्ह्यातील सरासरी आठ तालुक्यातील म्हणजेच तब्बल १०६ तालुक्यातून सुमारे ३०० हुन अधिक शिष्टमंडळानी तहसीलदार यांना निवेदन देऊन संबंधित मागण्या मान्य होइपर्यंत लढा देणार असल्याचे सूतोवाच केले.
पुणे शहर तहसीलदार यांना संस्थापक तथा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी स्वतः उपस्थित राहून निवेदन सादर केले. त्यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात केंद्रीय सचिव दीपक पवार, सामाजिक कार्यकर्ते विकास साठे, संतोष सरोदे, आनंद बहिरट, दिव्या कोंतम, रफिक शेख, भरत चव्हाण, उमर शेख, नरेश भोसले, प्रशांत गायकवाड सहभागी झाले. त्याचसोबत प्रदेश उपाध्यक्ष चंद्रकांत सरवदे लातूर मधून, प्रदेश संघटक शैलेश खुंटे पिंपरी चिंचवड मधून, प्रदेश उपाध्यक्ष डी. डी. पाटील कोल्हापूर मधून, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. के. एम. ढोबळे उस्मानाबाद मधून, प्रदेश संघटक सचिन खरात दौंड मधून, प्रदेश सचिव डॉ. संध्याराणी निकाळजे सातारा फलटण मधून, प्रदेश उपाध्यक्ष कय्युम पटेल नाशिक मधून, प. महा. अध्यक्ष डॉ. सलीम आळतेकर इचलकरंजी मधून सहभागी झाले. सांगली जिल्हाध्यक्ष डॉ. एकादशी लोंढे, ठाणे जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, सोलापूर जिल्हाध्यक्ष दीपक काकडे, परभणी जिल्हाध्यक्ष अहमद अन्सारी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष किरण मोरे, रायगड अलिबाग मधून धनंजय म्हात्रे यांनी विशेष प्रयत्न करून सर्वस्तरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत तालुका तहसीलदारामार्फत मागण्यांचे पत्र दिले. परिषदेच्या संस्थापक नेत्या ऍड. वैशाली चांदणे यांनी इमेल द्वारे पंतप्रधान कार्यालयात निवेदन दिले.
संबधित विषय मार्गी लावण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून लढू असे रूग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले.