पुणे- प्रत्येक वेळी आंदोलन करणे ,निवेदने देणे ,अधिकाऱ्यांना फैलावर घेणे ,प्रसंगी महापालिका आयुक्तालयाला टाळे ठोकणे असे पराक्रम केल्याशिवाय ‘या ‘ प्रभागातल्या नागरिकाना पाणीच मिळत नाही . हा खेळ सुमारे साडेतीन वर्षे सुरु आहे . आणि आता पुन्हा या नगरसेवकाला , आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा देण्याची वेळ येवून ठेपली आहे. . विशेष म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकाला एवढे झगडावे लागते आहे. नाना भानगिरे नाव त्यांचे . उद्या ते याच पाणी प्रश्नावर महापालिका आयुक्तांना भेटणार आहेत,अधिकारी जाणून बुजून ,काही हेतूने पाण्याच्या मापात पाप करत असल्याचे सांगत आयुक्तांना निवेदन देणार आहेत. सौरभ राव असताना त्यांनी महापालिकेत डुकरे सोडली होती, महापालिका आयुक्त कार्यालयाला टाळे ठोकले होते, हंडा मोर्चे आणले होते .आता शेखर गायकवाड यांच्या कार्कीर्दीत हि प्रारंभ होताना दिसत आहे.
कोरोनाच्या महामारीत देखील अधिकारी वर्गाची सवय मोडत नाही ज्याला काही लोक मुजोरी हि म्हणतात . पूर्वी लोक नाना भानगिरे यांना तर संपर्क करीतच आता ‘मायमराठी ‘ कडे हि सातत्याने तक्रारी करू लागलेत .हांडेवाडी रोड ,चिंतामणी नगर ,बडदे वाडी ,हांडेवाडी रोड च्या सर्व सोसायटी परिसर ,महम्म्द्वाडी परिसर अशा सुमारे १ लाख लोकवस्तीला कधी कितीही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो आणि काही काही ठिकाणी तर १५ /१५ दिवस पाणी येत नाही अशा तक्रारी आहेत . एकीकडे सातत्याने हात धुवा सांगणाऱ्या महापालिकेने हात धुवायला च ,काय प्यायच्या पाण्याचीही मारामार करून ठेवली आहे आणि वर सातत्याने ..हाथ धुवा, हाथ धुवा.. असे उपदेशांचे डोस पाजून स्वच्छतेच्या पुजारी असल्याचा अविर्भावात राहणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्याला कोण काय करतंय अशा भ्रमात राहणं खर तर तर यापुढे तरी शहाणपणाचं ठरणार नाही .भामा आसखेड होऊ द्यात असे सांगत जनतेच्या सहनशीलतेचा अंत पाहणे रिस्क घेणे होणार आहे हे लक्षात घ्यायला हवंय.