पुणे-आषाढी वारी बाबत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती आज उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांना दिली. यंदा पायी वारी ला परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र यंदा देखील वारी बस नेच जाईल असा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये १० महत्वाच्या पालखी सोहळ्याला परवानगी देण्यात आली आहे.
दहा मानाचा पालख्यांपैकी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला, तसेच तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात प्रस्थानाला एकुण १०० लोकांना तर इतर पालख्यांमध्ये ५० जणांना परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर दोन्ही सोहळ्याचा एकुण ६० लोकांना बस ने पंढरपूर ला जाता येईल.वाखरी पर्यंत हा पालखी सोहळा बस ने जाईल तर पूजा गेल्या वेळ प्रमाणे होईल. पूजेसाठी फक्त ५ जणांना परवानगी असेल
महाद्वार काल्याला यंदा परवानगी देण्यात आली आहे. तर रथोत्सव साध्या पद्धतीने होईल असे पवार यांनी सांगितले.पवार म्हणाले,” अनेक जणांची यंदा पायी वारी साठी मागणी होती. मात्र ते करू नये अशी अनेक ग्रामस्थांनी मागणी केली. पायी वारी असेल तर दर्शनाची गर्दी टाळता येत नाही.त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.”