:महापौरसाहेब इंग्रज बनायचा प्रयत्न करू नका …मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे आक्रमक
: गणेश विसर्जना वर लादलेली अघोषित बंदी आम्ही मानणार नाही विसर्जन घाटावरच करणार….
पुणे-घरातल्या घरातच गणपती कसा बुडवायचा ? असा प्रश्न कॉंग्रेसचे गटनेते आबा बागुल यांनी उपस्थित केल्यानंतर आता मनसे ने घरीच विसर्जन या महापौरांच्या कल्पनेवर टीकेची झोड उठविली आहे . हव्या त्या ,योग्य उपाययोजना सुचवा, सोशल डिस्टन्सं बंधनकारक करा , दरवर्षी प्रमाणे मनपासेवकाच्या माध्यमातून विसर्जन योजना राबवा , अगदी गरज असेल तर आम्हाला ही सहभागी करून घ्या पण गणेश विसर्जनावर अघोषित बंदी लादू नका , घरातच विसर्जन करा हि एकूणच गणेश विसर्जनावर अघोषित बंदी आहे अशी भूमिका घेत महापौरांना मनसे ने आव्हान दिले आहे.
या संदर्भात मनसे चे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी महापौरांना दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि,
जगावर करोना संकट आहे तसच ते देशावर ही आहे आणि महाराष्ट्रावर ही आहे.आणि महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात तो फक्त देवदेवतांच्या मागे लागला आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे असे मनपाच्या निर्णया वरून वाटत आहे. काल परवा आपण पुणेकरांना गणपतीमूर्ती च्या साईज ठरवून देत गणेशाच्या मुर्ती घरातच विसर्जीत करायचं बंधन घातले.इंग्रजांच्या काळात ही अशीच बंधन घालण्यात येत होती.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करू नका हे आवाहन पुणेकरांनी स्वीकारलं गणेश मूर्ती देवळातच बसवण्याची तयारी ही सुरू झाली त्यात ही खरतर काही ठिकाणी अडचणी आहेत अनेक सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेश मुर्ती ना देवळं नाही त्या कुठे ठेवायच्या हा प्रश्न आहेच मा .चंद्रकांतदादानी देखील या संदर्भातील मागणी केली आहे. आणि अशा परिस्थितीत मांडवाची मागणी रास्त आहे.
आता प्रश्न गणेश विसर्जनाचा तर गणेश विसर्जनाला या वर्षी तरी कोणी मिरवणुका काढणार नाही घरगुती गणपतीच विसर्जन हे प्रत्येक घरातील जास्तीत जास्त ४ मंडळी कडून होत आणि सगळ्याच घरातील गणपती एकाच दिवशी आणि एकच वेळी विसर्जित होत नाही
1 दिवस दीड दिवस पाच दिवस सात दिवस गौरीगणपती दहा दिवस आणि अनंत चतुर्थी ला विसर्जित होणारे असे विविध दिवशी विसर्जित होणारे गणपती असतात आणि पुण्यात अश्याच स्वरूपात विसर्जन होते. आणि ते एकाच ठिकाणी होते असं ही नाही पुण्यातील प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयातील हद्दीत हे विसर्जन होते.या प्रत्येक विसर्जन ठिकाणी चेंगराचेंगरी झाल्याची आणि गर्दी मुळे पोलिसी कारवाई झाल्याची नोंद ही कुठेच नाही. मग घरीच विसर्जनाच आणि गणेश मूर्तीच्या उंचीचा बंधन का ?तुम्ही कोण आहात आमच्या धार्मिक बाबी मध्ये हस्तक्षेप करणारे ?
आणि ती ही गरज नसताना आहो बालाजी पासून ओंकारेश्वर पर्यंत सगळी मंदिर उघडली . तुम्ही सगळे मॉल उघडले राज्यसरकरच्या कृपेने अगदी पोलीस बंदोबस्तात वाईन शॉप उघडली त्या ठिकाणी गर्दी होत नाही का मटणाच्या दुकाना बाहेर चार चार किलोमीटरच्या रांगा लागल्या रस्त्यावर गर्दी आहे आणि देवांना का बंधन घालता? बंधन घालता आणि घाटावर विद्युत रोषणाई करता दोन अडीच कोटींची टेंडर कशा साठी काढता नक्की साधायच काय आहे.म्हणजे विद्युत विभागाचे टेंडर काढणार लोकांन वर बंधन घालून केमिकल खरेदी करणार हे नक्की कोणा साठी चर्चा अशी आहे की मध्यवस्तीतील एका विद्यमान लोकप्रतिनिधी च्या नातेवाईका साठी हा खटाटोप गेल्या 3 वर्षा पासून सुरू आहे . असे या पत्रकात म्हटले आहे . सोबत पत्र येथे पहा.