पुणे-लोकांना खरे बोललेले आवडते याच भावनेतून आज खासदार इम्तियाज जलील यांनी दोन महत्वपूर्ण विधाने केली आहेत , देशात आज कुठेच निष्पक्ष पत्रकारिता उरलेली नाही ,देशाचे मालक दोनच आहेत एक अदाणी आणि दुसरा अंबानी आणि ,राजनीतीचा स्तर जर खालावला असेल तर त्यास मतदार जबाबदार अशी वक्तव्ये आज खासदार इम्तियाज जलील यांनी येथे केली .
सध्या केवळ दोन माणसेच देश चालवत आहे. ते म्हणजे अदानी आणि अंबानी. उद्योजकांचे आठ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केले जाते आणि अर्थमंत्रीही त्याचे समर्थन करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे. या देशातील सुशिक्षित तरुणांना हेच आठ लाख कोटी रुपये दिले असते तर त्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाले असते अशी टीका खासदार इम्तिजाय जलील यांनी आज पुणे येथे केली.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सहाव्या युवा संसदचे उद्घाटन महादेव जानकर यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
इम्तिजाय जलील म्हणाले, जात, धर्म पाहून जेव्हा मतदान होते,तेव्हा आपल्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर देखील रस्ते आणि पाण्यासाठी मागणी करावी लागते,यास मतदारच जबाबदार आहेत ते माणूस पाहून मतदान करतील तेव्हाच यातून सुटका होईल असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.
इम्तिजाय जलील म्हणाले, पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असला तरी हा स्तंभही आता निष्पक्ष राहिलेला नाही. कोणाची तरी बाजू घेतल्याशिवाय कोणताही वर्तमानपत्र किंवा चॅनल पत्रकारिता करू शकत नाही अशी सध्या देशातील परिस्थिती आहे.