निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा
पुणे : मेट्रो कंपनीने दबावाखाली येत राष्ट्रवादीला फुकटचे श्रेय देण्याच्या उद्देशाने मेट्रोच्या चाचणीचा कार्यक्रम घेतला हे चुकीचे आहे असले प्रकार आम्ही खपवून घेणार नाही असा इशारा देत दुसरीकडे व्यापाऱ्यांना आंदोलनाला पाठींबा आहेच,हवे तर नेतृत्व करू , चाललय काय ? किती दिवस व्यापार बंद ठेवणार आहात ? काय लॉजिक आहे, दारूची दुकाने चालू ठेवायची आणि किराणा व कपड्याची दुकाने बंद ठेवायची ? असे सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार यांनी आज आपला संताप व्यक्त केला
चंद्रकांतदादा पाटील सोमवारी पुण्यात पूरग्रस्तांसाठी मदत साहित्य नेणारे वाहन रवाना केल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.यावेळी ते म्हणाले,’ मेट्रो कंपनीचा आम्ही निषेध करतो. अशा प्रकारे दबावाखाली काम करायचं असेल तर आम्हालाही दबाव निर्माण करता येतो. ११ हजार कोटीची हि मेट्रो आहे , मोदींनी सर्व परवानग्या दिल्या,केंद्राने ६ हजार कोटीची हमी दिल्यावर, लोन मिळाले , २ हजार कोटी प्रत्यक्ष दिले तेव्हा हि मेट्रो सुरु झाली आणि मोदींचा साधा फोटोही नाही ? २०१६ साली मेट्रो सुरु झाली ,सोशल मिडिया तून याबाबत अजित पवारांच्या हस्ते असा प्रचार केला जातोय ,लोकांना कळत नाही काय , मेट्रो कोण करतंय, मेट्रोच्या दीक्षित यांना ठणकाऊन सांगणार आहे यापुढे देवेंद्र फडणवीस यांच्या शिवाय कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तो होऊ देणार नाही , शेवटच्या कार्यक्रमाला तर मोदींना बोलावावेच लागेल ,आम्ही काय फुकटचं मागतोय का? तुम्ही फुकटची उद्घाटने करताय इथे , माझ्या मतदारसंघात कार्यक्रम घेऊन मी नाही तिथे ,खासदार बापट नाहीत , यापुढे असं केलं तर खपवून घेणार नाही असा गर्भित इशारा चंद्रकांत पाटलांनी दिला आहे.
लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही लोकांनी घराबाहेर पडायचे नाही का, किती दिवस जनजीवन बंद ठेवणार, असे संतप्त सवाल महाविकास आघाडी सरकारला करतानाच भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी निर्बंधांच्या विरोधातील व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा असेल असे जाहीर केले.
ते म्हणाले की, सरकार किती दिवस व्यापार बंद ठेवणार आणि जनजीवनही बंद ठेवणार आहे ? दारुची दुकाने चालू ठेवायची आणि कपड्यांच्या आणि किराणा दुकानांवर निर्बंध लादायचे याला अर्थ नाही. आर्थिक व्यवहार बंद राहिले तर लोकांना जगणे अवघड होईल. दुकाने पुन्हा एकदा नियमितपणे सुरू झाली पाहिजेत. व्यापाऱ्यांच्या आंदोलनाला भाजपाचा पाठिंबा आहे. गरज पडल्यास आपण स्वतः व्यापाऱ्यांचे नेतृत्व करू.
ते म्हणाले की, राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपाच्या आमदारांनी एक महिन्याचे मानधन मुख्यमंत्री सहायता निधीला दिले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी – चिंचवड येथील महानगरपालिकांच्या भाजपा नगरसेवकांनी एक महिन्याचे वेतन मदत म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपाचे सर्व लोकप्रतिनिधी पूरग्रस्तांसाठी मदत करतील. पूरग्रस्तांसाठी कोणते मदत साहित्य पाठवायचे याची यादी पक्षातर्फे कार्यकर्त्यांना पाठवली आहे व त्यानुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात मदत सुरू केली आहे. पुण्यातून आतापर्यंत मदत साहित्याचे अठरा ट्रक – टेंपो पूरग्रस्त भागात रवाना झाले आहेत. मुंबई भाजपा अध्यक्ष मंगलप्रभात लोढा, प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड यांनी मुंबईतून मदत पाठवली आहे. भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कोल्हापूरसाठी मोठ्या प्रमाणात मदत पाठवली आहे. सामाजिक बांधिलकी म्हणून भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात मदत करत आहेत.
पूरग्रस्तांकडील सर्व काही उद्धवस्त झाले असल्याने सरकारने त्यांना तातडीने मदत केली पाहिजे. २०१९ साली कोल्हापूर – सांगलीमध्ये पूर आला असताना देवेंद्र फडणवीस सरकारने ज्या पद्धतीने लोकांना तातडीची मदत केली होती त्या पद्धतीने ठाकरे सरकारने आता लोकांना मदत करण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाची रिक्त पदे ३१ जुलैपर्यंत भरायचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले होते पण त्यांनी ते पूर्ण केले नाही. खोटे बोलायचे आणि वेळ मारून न्यायची अशी महाराष्ट्र विकास आघाडीची पद्धती आहे. मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, शेतकरी कर्जमाफी अशा सर्व बाबतीत आघाडी सरकारने खोटारडेपणा केला आहे, अशी टीका त्यांनी केली.