पुणे- जनसामान्यात मिसळलेला ,जनसामान्यांचा चेहरा बनलेला कॉंग्रेस हा पक्ष आहे जो कधीही धुळीस मिळू शकत नाही , तो देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे ,लोकांना भुरळ पाडून अनेक नवनवे पक्ष वेगाने येतील आणि त्यांच्याच कृतीने तेवढ्याच वेगाने संपतील देखील पण वास्तव जाणणारा ,आणि वास्तवात जगणारा जनसामान्यांचा पक्ष अविरत पणे देशाची सेवा करत राहील हे कार्यकर्त्यांनी लक्षात घ्यावे असे प्रतिपादन आज कॉंग्रेस भवनात अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून केले .
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा श्रीमती संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, स्व. इंदिरा गांधी, स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास श्रीमती संध्यताई सव्वालाखे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.सव्वालाखे यांचा सत्कार पुणे शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व पुणेरी पगडी घालून सत्कार करण्यात आले. या प्रसंगी मोहन जोशी, संगीता धोंडे ( महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष ), दीप्ती चौधरी, कमल व्यवहारे, संगीता तिवारी, सोनाली मारणे, नगरसेविका पूजा आनंद, सीमा सावंत, गिरिजा कुदळे उपस्थित होते.
सव्वालाखे यांच्या सूचनेनूसारआज महिला काँग्रेसची पश्चिम महाराष्ट्र आढावा बैठक सकाळी १० वाजता काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आली होती . कोरोनाच्या काळात महिला काँग्रेसच्या बैठका आँनलाईन होत होत्या तसेच कोरोनाच्या काळात प्रदेश महिला अध्यक्षा श्रीमती संध्याताई सव्वालाखे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात सर्व जिल्हा शहर तालुका महिला अध्यक्षा आणि त्यांच्या सहकारी यांनी रस्त्यावर उतरून कामे केली त्याचा उल्लेख त्यांनी केला या परीस्थितीमधील सर्व महिला काँग्रेसचे काम,आंदोलने ,मोर्चे,, आगामी येणाऱ्या निवडणूक संबंधी तयारी नियोजन महिला काँग्रेसचे संघटन याबाबत पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्हा ,शहर ,तालुका महीला अध्यक्षा आणि पदाधिकारी यांना मार्गदर्शन करून बैठकीत आढावा घेण्यातआला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन श्रीमती संगीता तिवारी यांनी केले.