पुणे- दक्षिण पुण्याला लाभलेले नैसर्गिक जलसंपदा सौख्य पाहता इतिहासात पुण्याला पाणी पुरवठा करण्यासाठी कात्रजला २ धरणे बांधली गेली . पुढे इंग्रजाच्या काळात खडकवासला धरण झाले .. १९८० पर्यंत खडकवासल्या बरोबर कात्रजच्या या धरणांतूनही पुण्याला पाणीपुरवठा होत होता. नंतर कात्रजच्या या ऐतिहासिक धरणांकडे दुर्लक्ष होत गेले … रानगवा येथे आला ..आणि नंतर या धरणांचे तलाव बनले , पर्यटन केंद्र बनले आजूबाजूचा हरित पट्टा उठला कॉंक्रिटचे जंगल झाले.आणि तलाव नावापुरते बिनावापाराचे पाणी बनून राहिले .पण आता कात्रजची जलसंपदा पुन्हा एकदा चर्चेत येते आहे . या परिसरात म्हणजे भिलारे वाडी ,निंबाळकरवाडी,गुजरवाडी या परिसरात नवीन धरण बांधण्याची मागणी मनसे चे नगरसेवक वसंत मोरे यांनी केली आहे.
त्यास निमित्त ठरले आहे ते , नवे कमिशनर शेखर गायकवाड यांचे वक्तव्य आणि त्यावर उपमुख्यमंत्री अजितपवार यांचे वक्तव्य …. जलसंपदा विभागाला पाणीपट्टी एवढी द्यायची कि त्यातून आपण धरण विकत घेवू शकू आणि ५० /५० वर्षे पाणीपट्टी देण्यापेक्षा धरण विकत घेतलेलेच बरे अशा आशयाचे वक्तव्य काल बजेट सादर करताना शेखर गायकवाड यांनी केले आणि त्यावर नव्या धरणाला आता जागा शिल्लक आहे कुठे असा सवाल अजितदादांनी केला . या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी कात्रज च्या निसर्गसंपदा लाभलेल्या या परिसराकडे बोट दाखविले आहे . नुसते बोट दाखविलेले नाही तर त्यांनी याबाबत आयुक्तांना लेखी पत्र दिले आहे.
या परिसरात एकूण पाच पाझर तलाव आहेत २ महापालिकेच्या मालकीचे तर ३ राज्य शासनाच्या मालकीचे आहेत. भिलारेवाडी ,निंबाळकरवाडी,गुजरवाडी या परिसरात छोटे धरण बांधल्यास आणि बंद नळाने पाणीपुरवठा केल्यास काही भागाचा पाणी प्रश्न इथल्या इथे सुटू शकतो आणि पर्यायाने खडकवासल्यावरील ताण कमी होवू शकतो असे त्यांनी या पत्रात म्हटले आहे.याप्रकरणी मायमराठी शी बोलताना पहा आणि ऐका वसंत मोरे यांनी काय म्हटले आहे.