नगरसेवक अमोल बालवडकरांकडून सुस -म्हाळुंगे ला रोज २० टँकर पिण्याचे पाणी – फडणविसांच्या वाढदिनी शुभारंभ
पुणे- एका सामान्य गिरणी कामगाराचा मुलगा असल्याने मी कधी परिणामांची पर्वा केली नाही. २३ गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश करण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. परंतु आता निर्णय झालाच आहे तर त्याची अमंलबजावणी करण्यासाठी आपण सर्व खांद्याला खांदा लावून काम करू !असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी येथे केले.
माजी मुख्यमंत्री तथा विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याकडून सुस म्हाळुंगे ला रोज २० टँकर( प्रतिदिन २ लक्ष लिटर) पिण्याचे पाणी मोफत पुरविण्याच्या उपक्रमाचा आज शुभारंभ आ. पाटील यांच्या हस्ते करण्यात आला . यावेळी ते बोलत होते.
आ. पाटील यावेळी असेही म्हणाले ,’कोरोना काळात कर वसुली कमी झाल्याने महानगरपालिकेला आधीच सुविधा कमी कराव्या लागल्या आहेत. त्यात महाविकास आघाडी सरकारने या २३ गावांचा पुणे महानगरपालिकेत समावेश केल्याने सुविधा देण्यासाठी महानगरपालिकेकडेच पैसे नाहीत .करायचीच होती तर २३ आणि ११ गावांची असी नवी महापालिका करायची होती.कोविड च्या काळात राज्याकडे देखील पैसे नाहीत , नवीन काही देणार तर नाहीच पण या गावांचं अस्तित्व मात्र आता हिराऊन घेतल. या गावांच्या जमिनीवर आरक्षणे टाकणार , माझा अशा समावेशाला सक्त विरोध होता.
देशामध्ये म्हाळुंगे बालेवाडी क्रीडानगरी नाव मोठे पण -पाण्याच्या नियोजनाचा अभाव,समाविष्ट गावांचा २४ बाय ७ योजनेत समावेश करावा- बालवडकर
नगरसेवक बालवडकर म्हणाले,’ पुणे मनपा मध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या सुस व म्हाळुंगे या दोन गावांमध्ये माझ्या वतीने रोज २ लक्ष लिटर म्हणजेच रोज २० टँकर पिण्याच्या कॉर्पोरेशनच्या पाण्याचा पुरवठा करण्याचा संकल्प मी देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिनी केला आहे. . या निमित्ताने आज सकाळी म्हाळुंगे गावात आ. पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. देशामध्ये म्हाळुंगे बालेवाडी क्रीडानगरीचे अतिशय आदराने नाव घेतले जाते. विशेष म्हणजे देशातले व राज्यातले अनेक नागरिक या ठिकाणी वास्तव्य करण्यास येत आहेत. एवढं सगळं असूनही म्हाळुंगे गावाला आज पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात सतावत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात गावातील पाण्याची समस्या सोडवायची असेल तर पायाभूत सुविधांची गरज आहे. खऱ्या अर्थाने ही पाण्याची कमतरता नसून पाण्याच्या नियोजनाचा अभाव आहे, सुस म्हाळुंगे सहित नव्याने महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या सर्व गावांचा २४x७ या योजनेमध्ये समावेश करण्यात यावा आणि पाइपलाईनचे व पाण्याच्या टाक्यांचे काम आ. चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकाराने व्हावं .
या कार्यक्रमाला संदीप खर्डेकर, मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, म्हाळुंगे गावचे सरपंच मयूर भांडे, सौ. बेबीताई पाडाळे, काळूरामजी गायकवाड,सौ. गिताताई गुजर, विवेक खैरे, पांडुरंग पाडाळे,मदनराव पाडाळेश्री. अजिंक्य निकाळजे, सौ. स्मिता पाडाळे, युवराज कोळेकर, संदीप खर्डेकर, उज्ज्वल पाडाळे, ग्रामपंचायत सदस्या बेबीताई खैरे राजेंद्र पाडाळे सुनिल पाडाळे लक्ष्मण पाडाळे ,राहुल कोकाटे, स्विकृत नगरसेवक सचिन पाषाणकर, प्रभाग अध्यक्षा उमाताई गाडगीळ, रिमा सोमय्या, किरण तापकिर,सदाशिव मोरे ,रंजित पाडाळे मनोज शेठ पाडाळे हिरामण पाडाळे निवृत्ती कोळेकर हरिचंद्र गायकवाड मुरलीधर गायकवाड भानुदास पाडाळे,सोपान खैरे भगवान खैरे नामदेवराव गोलांडे संजय पाडाळे ,सुरेश पाडाळे ,अशोक पाडाळे राजू शेडगे ,संतोष बबन पाडाळे ,पंकज पाडाळे नंदकुमार गायकवाड सुरेद्र मोहोळ भगवान कामठे शंकर पाडाळेरंजित मोहोळ अनिल गायकवाड रविंद्रशेठ गायकवाड गोविंद खैरे बाळासाहेब कोळेकर प्रशांत पाडाळे तुषार हगवणे अमोल बालवडकर फाऊंडेशन चे सर्व सभासद व मित्रमंडळ उपस्थित होते म्हाळुंगे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य व ग्रामस्थ, प्रभाग ९ चे सर्व भाजपा पदाधिकारी व सभासद यावेळेस उपस्थित होते.