मुंबईला एक न्याय आणि अन्य महाराष्ट्राला दुसरा न्याय असे योग्य नाही – सेनेला इशारा
भाजपाला रोखायचे कि कॉंग्रेसला ?
पुणे- : केवळ कॉंग्रेसला अडचणीत आणण्यासाठी ,आणि केवळ कॉंग्रेसला घाबरूनच तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आणल्याचा दावा येथे आज राजकीय समीक्षकांनी केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान कॉंग्रेस बरोबर आप आणि मनसे चे हि नुकसान करून केवळ भाजपच्या हितासाठी हि तीन सदस्यीय प्रभाग पद्धत आणल्याचा आरोप होतो आहे. गुरुवारी (आज) टिळक भवनात झालेल्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले आणि तीन सदस्यांचा प्रभाग नको, असे सांगत पदाधिकारी आक्रमक झाले. बहुतांशी नेते, पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतल्यानंतर ही दोन सदस्यीय प्रभागांचा प्रस्ताव आणण्याचा निर्णय झाला.आधीही एक सदस्यीय प्रभाग असावा, असा प्रस्ताव पक्षाने समन्वय समितीपुढे ठेवला होता.एकीकडे कॉंग्रेसकडे उमेदवार नाहीत , मनसे कडे , आप कडेही उमेदवार नाहीत म्हणणारे भाजपा आणि राष्ट्रवादीची हि चाल असून त्यास सेना का साथ देते आहे ?राष्ट्रवादीला भाजपाला रोखायचे कि कॉंग्रेसला ? असा सवाल देखील या निमित्ताने उपस्थित केला जातोय . महापालिकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग पद्धत ठरविण्यावरून महाविकास आघाडीतही धूसफूस सुरू झाली असून, या पद्धतीवर काॅंग्रेसने उघडपणे नाराजी मांडून, महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात ठराव केला.मुंबई वगळता अन्य महापालिकांसाठी दोन सदस्यांचा प्रभाग हवा, असा आग्रह काँग्रेस नेत्यांनी धरला आहे. नवी प्रभाग पध्दती करून भाजपला हरविण्याआधीच ठाकरे सरकारमधील मित्रपक्षांत जुंपल्याचे चित्र आहे.उमेदवार कसे ठरविणार , महिला उमेदवार आणि जातनिहाय उमेदवार कसे देणार ? आघाडी झाली तर कसे होणार ? या प्रश्नांपेक्षा ज्याला त्याला आपापल्या हिमतीवर ,कर्तुत्वावर लढता येईल असा एक सदस्यीय वर्द मुंबईत देता येतो मग तो अन्य महापालिकांना का नाही ? असा सावळी उपस्थित केला जातोय . मुंबईला एक न्याय आणि अन्य महाराष्ट्राला एक न्याय असे चालणार नाही असेही सांगितले जातेय .
राज्यातील महापालिकांसाठीचा चार सदस्यीय प्रभाग पध्दत रद्द करून त्याऐवजी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयात कोणतेही राजकारण नसल्याचे सांगून मित्रपक्षांशी चर्चा करून प्रभागांचा ठराव केल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी रात्री जाहीर केले होते. त्यादरम्यान काँग्रेसच्या काही नेत्यांनी या पध्दतीला विरोध करीत, दोन सदस्यांची प्रभाग पध्दत योग्य असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात नव्या प्रभागांबाबत रोष असल्याचेही उघड झाले होते.आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीतील नव्या पदाधिकाऱ्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, कार्याध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत झाली. महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग पध्दती ठरविण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या अनेकदा बैठका झाल्या. तेव्हा या तिन्ही पक्षांचे निरनिराळे प्रस्ताव असल्याने प्रभागांचा निर्णय लांबणीवर पडला होता. परंतु, या निवडणुका चार-साडेचार महिन्यांवर आल्याने अखेर बुधवारी मंत्रिमंडळात मुंबईत एक आणि इतर महापालिकांसाठी तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचे निश्चित झाले. हा एकमताने घेतल्याचे सांगण्यात आले.तीन सदस्यांचा प्रभाग झाल्यास पुण्यात ५६ प्रभाग व १६७ नगरसेवक होतील.पुणे महापालिकेची आगामी निवडणूक तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीने करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. या निर्णयाला कॉंग्रेसने आज विरोध दर्शविला आहे.त्यामुळे तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीच्या निर्णयात बदल होऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येऊ लागली आहे.