पुणे -केंद्रातील मोदी सरकारने दिल्ली येथील अमरजवान ज्योती स्मारकाचे नॅशनल वॉर मेमोरियलशी विलगीकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे मोदी सरकाने शहिद जवानांचा अपमान केला आहे. या निर्णयाच्या निषेधार्थ आज पुणे शहर जिल्हा काँगेस कमिटीच्या वतीने शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्या नेतृत्वाखाली कर्णिक स्मारक फरासखाना ते टिळक पुतळा मंडई पर्यंत ‘निषेध रॅली’ आयोजित करण्यात आली होती. ‘मोदी सरकारचा धिक्कार असो’, ‘शहिदों का अपमान नही सहेगा हिंदूस्तान’, ‘ऐतिहासिक अमरजवान ज्योती स्मारकाचे नामोनिशाण मिटविणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो’ अशा घोषणा देत काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी टिळक पुतळा मंडई येथे पोहचून रॅलीचा समारोप केला.या निषेध रॅलीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर, कमल व्यवहारे, संजय बालगुडे, अरविंद शिंदे, गोपाळ तिवारी, मेजर लेखा नायर, सोनाली मारणे, अमीर शेख, रविंद्र धंगेकर, लता राजगुरू, अविनाश बागवे, रफिक शेख, वैशाली मराठे, सुजाता शेट्टी, शिवाजी केदारी, पुजा आनंद, संगीता तिवारी, राजेंद्र शिरसाट, द. स. पोळेकर, भुषण रानभरे, चंद्रशेखर कपोते, अशोक जैन, सौरभ अमराळे, नुरूद्दीन सोमजी, शानी नौशाद, राहुल तायडे, शोभना पण्णीकर, ताई कसबे, राजू नामेकर, आयुब पठाण, रमेश सकट, प्रविण करपे, प्रदिप परदेशी, रमेश सोनकांबळे, विजय खळदकर, राजेंद्र भुतडा, विठ्ठल गायकवाड, प्रशांत सुरसे, राजेंद्र पेशने, राजू मगर, डॉ. अनुप बेगी, बाळासाहेब मारणे, सुरेखा खंडागळे, ज्योती परदेशी, नंदा ढावरे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ठिकाणी बोलताना शहराध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, ‘‘अमरजवान ज्योती १९७१ च्या युध्दात शहिद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ त्यावेळच्या काँगेस सरकारने बांधले. पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी या स्मारकाचे उद्घाटन कले होते. १९७१ च्या भारत पाकिस्तानचे युध्द झाले आणि अवघ्या १३ दिवसात भारतीयांनी युध्द जिंकून बांग्लादेशाची निर्मिती केली. स्व. इंदिरा गांधीचे खंबीर नेतृत्व आणि भारतीय सेनेने केलेल्या उत्तम कामगिरीमुळे हे युध्द आपण जिकंले. या युध्दामध्ये शहिद झालेल्या जवानांचा सन्मान करण्यासाठी अमरजवान ज्योतीचे स्मारक उभारले आणि आज मोदी सरकारने त्या स्मारकाचे विलगीकरण करून शहिद जवानांचा अपमान केला आहे. काँग्रेस व गांधी घराण्याच्या द्वेषापोटी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे. मोदी सरकार सातत्याने इतिहास बदलण्याचा प्रयत्न करीत आहे आणि त्यांच्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेसने देशाच्या हितासाठी विरोध दर्शविला आहे. देशभक्तीचा अनुभव नसलेला पक्ष आज देशाचे नेतृत्व करीत आहे. शहिदांचा अपमान करणाऱ्या मोदी सरकारला जनता धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.’’
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. अभय छाजेड यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.