- सन 2021-22 या आर्थिक वर्षात राज्य सहकारी बँकेला रु.1,402 कोटीचा ढोबळ नफा तर रु.602 कोटीचा निव्वळ नफा
- नेट एन.पी.ए. 0 %,गेल्या 111 वर्षातील उच्चांकी उलाढाल रु.47,028 कोटी प्रोव्हीजन कव्हरेज रेशो -100 %
पुणे – महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला २०२१-२२ या आर्थिक वर्षात एक हजार ४०२ कोटींचा ढोबळ नफा तर, ६०२ कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. तसेच, नेट एन.पी.ए.चे प्रमाण शून्य असून, गेल्या १११ वर्षांतील उच्चांकी आर्थिक उलाढाल ४७ हजार २८ कोटी रुपयांपर्यंत पोचल्याची माहिती राज्य बॅंकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. राज्य बॅंकेचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अजित देशमुख यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.
अनास्कर म्हणाले, राज्य बँकेने ३१ मार्च २०२२ अखेर आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेच्या सर्व आर्थिक निकषांचे पालन केले आहे. बँक प्रशासनाने राबविलेल्या विविध योजना आणि धोरणात्मक निर्णयामुळे बँकेची प्रगती होत आहे.
राज्य बँक दरवर्षी मुख्यमंत्री सहायता निधीला पाच कोटींची रक्कम देते. बॅंकेच्या सभासदांना दरवर्षी १० टक्के लाभांश देण्यात येतो. बॅंकेच्या सहा कर्मचारी संघटनेसोबत करार करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना १२ टक्के भरीव वेतनवाढ दिली आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सामाजिक बांधिलकी जपत कैद्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘जिव्हाळा’ कर्ज योजना सुरू केली आहे.
सर्व आघाडयांवर गतवर्षाच्या तुलनेत भरघोस वाढ ,:-
बँकेच्या आकडेवारीमध्ये बँकेच्या नक्त मुल्यांमध्ये गत वर्षीपेक्षा रु.500 कोटीने वाढ होवून ते रु.3,203 कोटी पर्यंत पोहोचले आहे. बँकेचे स्वनिधी रु.6,000 कोटीपर्यंत पोहोचला आहे. बँकेच्या व्यवहारामध्ये रु.3,426 कोटीने वाढ होवून ते रु.47,028 कोटी पर्यंत पोहोचले आहे. बँकेच्या ढोबळ नफ्यामध्ये रु.626 कोटीची भरीव वाढ होवून तो रु.1,402 कोटीवर पोहोचला आहे. बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये रु.238 कोटीची वाढ होवून तो रु.602 कोटी पर्यंत पोहोचला आहे. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बँकेने घेतलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार बँकेच्या सेवकांची संख्या कमी केल्याने सन 2018 मध्ये असलेला प्रति सेवक व्यवसाय रु.26 कोटी वरुन आज रु.65 कोटी पर्यंत पाहोचला आहे. अशा प्रकारे सर्वच आघाडयांवर बँकेने प्रगती केलेली असून सोबत तुलनात्मक आकडेवारीची पुस्तिका जोडली आहे.
ऑडिट वर्ग
बँकेस गेली 9 वर्ष लेखापरीक्षणामध्ये सतत `अ’ ऑडिट वर्ग प्राप्त होत आहे. मागील 8 वर्षापासून बँक सभासदांना 10… इतका लाभांश देत आहे. तसेच बँक दरवर्षी रु.5 कोटी इतकी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत आहे.
बँकेच्या वाढत्या प्रगतीची मुख्य कारणे ः
राज्य बँकेने आपल्या सेवकांची 100 क्षमता उपयोगात आणण्यासाठी तसेच अनावश्यक कर्मचारी संख्या कमी करण्यासाठी जाहीर केलेल्या स्वेच्छा निवृत्ती योजनेमुळे सेवकांच्या संख्येमध्ये मोठया प्रमाणावर घट झाल्याने बँकेची नफा क्षमता वाढली आहे.
• बँकेने आपले व्यवहार फक्त जिल्हा बँका, साखर कारखान्यांपर्यंतच सिमित न ठेवता नागरी सहकारी बँका, पतसंस्था, औद्योगिक क्षेत्र तसेच महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाद्वारे शेतकऱयांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी आखलेल्या योजनेमुळे बँकेच्या व्यवसायात कमालीची वृध्दी झाली आहे.
• बँकेने राज्यातील नागरी सहकारी बँकांना सरकारी कर्जरोख्यांची खरेदी-विक्री करण्यासाठी स्वतंत्र प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन दिला आहे. तसेच आरटीजीएस/एनईएफटी या व्यवहारांसाठी थेट पोर्टल उपलब्ध करुन दिले आहे. सीटीएस क्लिअरिंगसारख्या अनेक सुविधा राज्य बँकेने सहकारी बँकांना उपल्बध करुन दिल्या आहेत.
• सहकारी बँकिंग क्षेत्रासाठी बँकेने `सायबर ऑपरेशन सेंटर’ उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतला आहे.
• विदेश विनिमय व्यवहार ः-राज्य बँकेस विदेश विनिमय व्यवहारासाठी रिझर्व्ह बँकेने अधिकृत परवाना दिला असून आपल्या ग्राहकांना व अनेक नागरी सहकारी बँकांना व त्यांचे ग्राहकांना विदेश विनिमयाची तसेच एक्सपोर्ट व इंपोर्ट क्रेडिट लिमिट देत असून त्यांचे फॉरेक्स व्यवहार राज्य बँक समर्थपणे हाताळत आहे.
बचत खात्यावरील व्याजदरत 4 पर्यंत वाढ ः- सामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी राज्य बँकेने बचत खात्यावरील व्याजदरात 0.50
ने वाढ तो 4 वर नेला आहे.
• आजारी साखर उद्योगासाठी अनेक योजना ः- ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेला साखर उद्योग, सूत गिरण्या यांचेसाठी बँकेने आत्मनिर्भर कर्ज योजना, पुनर्बांधणी कर्ज योजना, एकरकमी परतफेड कर्ज योजना अशा विविध कर्ज योजनांद्वारे या व्यवसायात स्थिरता ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
सेवक करार
बँकेच्या सेवक कराराची मुदत दि.31.3.2021 रोजी संपल्याबरोबर अत्यंत अल्प कालावधीत दि.4 मार्च 2022 रोजी पुढील 5 वर्षाकरिता बँकेच्या एकूण 6 कर्मचारी संघटनांबरोबर सेवक करार केला असून, त्याद्वारे सेवकांना सरासरी 12… इतकी भरीव वाढ दिलेली आहे.
सहकारी क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी
सहकारी क्षेत्रामध्ये अडचणीत असलेले साखर कारखाने, सूत गिरण्या व इतर सहकारी संस्थांची बँकेच्या कर्ज वसुली अंतर्गत विक्री न करता त्या भाडयाने देण्याचा धोरणात्मक निर्णय बँकेने घेतला. त्यामुळे सहकारी क्षेत्रातील संस्थांचे रुपांतर खाजगी क्षेत्रामध्ये न होता सहकारी क्षेत्र आबाधित ठेवण्यासाठी बँकेने प्रयत्न केले आहेत.
अडचणीतील जिल्हा बँकांच्या कार्यक्षेत्रातील शेतकऱयांना कर्जपुरवठा
राज्य बँकेने अडचणीतील जिल्हा बँकांच्या अंतर्गत येणाऱया विविध कार्यकारी सोसायटयांना थेट कर्जपुरवठा करण्यासाठी नाबार्डकडे मागितलेल्या परवानगीस नुकतीच मंजुरी मिळाल्याने शेतकऱयांना मोठी मदत होणार आहे.
सामाजिक बांधिलकीः–
बँकेने स्वतची प्रतिमा उंचावत असतांनाच सामाजिक बांधिलकीची जाण ठेवून कारागृहातील कैद्यांना त्यांच्या करागृहातील उत्पन्नावर, कैंद्यांच्या कुटुंबातील मुलामुलींचे शिक्षण, आरोग्य, मुलामुलींचे विवाह सारख्या कौटुबिक गरजा भागविण्यासाठी `जिव्हाळा’ कर्ज योजना आखली आहे. अशा प्रकारे कैद्यांना कर्ज देणारी जगातील एकमेव बँक ठरली आहे.
• वरिष्ठ नागरीकांकरिता ज्यादा व्याजदर ः-देशभरातील बँकांनी ठेवींवरील व्याजदरात मोठया प्रमाणावर कपात केली आहे. परंतु राज्य बँकेने कोव्हीड – 19 संसर्गाच्या पार्श्वभूमीवरदेखील वरिष्ठ नागरीकांकरिता त्यांच्या ठेवींवर एक टक्का अधिक व्याजदर देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा वरिष्ठ नागरीकांना काही प्रमाणात नक्कीच दिलासा मिळेल.