ठाणे येथेही धर्मवीर
पुणे- येथील सेंट्रल ऑफ एक्सलन्स फॉर डेअरीच्या पाहणी दौऱ्या दरम्यान विविध विषयांवर आज शरद पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले,संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा,याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही.अजित पवार यांचे स्टेटमेंट पाहिले. संभाजी महाराजांसंबंधी ते लिखाण आहे. माझ्यासमोर दोन प्रकारची लिखाण आली आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एकेकाळचे प्रमुख व स्वातंत्र्यवीर सावरकर या दोन व्यक्तींनी संभाजी महाराजांबद्दल लिहिलेले लिखाण हे कोणाला पसंद पडणारे नाही परंतु ते कधी काळी लिहिले होते ते कारण नसताना उखरून काढून राज्यामध्ये वातावरण खराब करण्यात अर्थ नाही.स्वराज्यरक्षक आणि धर्मवीर हा प्रश्न आहे त्यामध्ये ज्या नागरिकांना, घटकाला, व्यक्तीला संभाजी महाराजांबद्दल बोलताना स्वराज्यरक्षक म्हणून त्यांच्या कामगिरीची आठवण होत असेल तर त्यासंबंधी उल्लेख करण्यात काहीही चुकीचे नाही. काही घटकांना ते धर्मवीर म्हणून उल्लेख करायचाअसेल तर धर्माच्या दृष्टीकोनातून ते बघत असतील तर त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. त्या व्यक्तीचे ते मत आहे ते मांडण्याचा अधिकार आहे. संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर, कोणी स्वराज्यरक्षक म्हणा, याबद्दल माझ्या मनात कोणती शंका नाही.शिवछत्रपती गेल्यानंतर राज्यावर हल्ले होत असताना स्वत:च्या भवितव्याचा विचार न करता राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी महत्वाचे काम केले त्याची नोंद आपण घेतली तर काही चुकीचे नाही. त्यामुळे यात वाद करण्याचे काही कारण नाही.सध्याचे राज्यकर्ते हे प्राथमिक समस्या ज्या आहेत ज्यामुळे लोक अस्वस्थ आहेत असे विषय बाजूला ठेवून त्यापासून लोकांची मत वेगळ्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करत आहेत.मुख्यमंत्र्यांकडे संयुक्त सत्ता आहे. राज्यात लव्ह जिहादसंबंधी कायद्याची मागणीकरिता मोर्चे करण्याची काय गरज आहे. आपल्याकडे सत्ता असताना सत्तारुढ लोकांना विश्वासात घेऊन निर्णय घेऊन टाकावा. जे करायचे ते करावे याला कोणाचाही विरोध नसेल.कोणत्याही पक्षाला आपल्या कामाचा विस्तार करण्याचा अधिकार आहे. तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या विस्तार करण्याची भूमिका घेतली याचा आनंद आहे.भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे मिशन ४५ नसून ४८ हवं होते. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. त्यांनी महाविकास आघाडीवर केलेली टिप्पणी माझ्या वाचनात आली. त्यांच्या राज्यात नुकतीच झालेली निवडणूक त्यांच्या हातात सत्ता होती मात्र लोकांनी त्यांना सत्तेपासून दूर केल. एका पक्षाचे अध्यक्ष असताना त्यांच्या स्वत:च्या राज्यामध्ये त्यांच्या पक्षाला सत्तेत असताना, केंद्राची सत्ता हाती असताना निवडणुकीमध्ये यशस्वी होता आले नाही. अशा व्यक्तीने अन्य ठिकाणी जाऊन यशस्वी होण्याची नोंद किती गांभीर्याने घ्यावी याचा विचार करण्याची आवश्यकता नाही.ज्या पद्धतीने कर्नाटक सरकार सीमाभागातील मराठी बांधवांसंबंधी वर्तन करत आहेत ते बघितल्यानंतर मराठी जनतेची मागणी केंद्राने मान्य करावी किंवा सीमाप्रश्न अजूनही कोर्टात प्रलंबित असल्याने कोर्टाचा निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित केलं तरी हरकत नाही. त्यामुळे लोकांना काही प्रमाणात न्याय मिळेल.
ठाणे येथेही धर्मवीर
शरद पवार म्हणाले, धर्मरक्षक याबाबतची जी काही तक्रार आहे की, त्याबद्दल मला थोडीसी काळजी वाटते. कारण ठाणे येथे जातो त्यावेळी धर्मवीर म्हणून काही नेत्यांचे नावे ऐकू येतात. राज्याचे मुख्यमंत्री एकेकाळचे आमचे सहकारी होते, त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते. काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर म्हणून उल्लेख केला जातो. म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय? संभाजी महाराजांवर जी आस्था आहे त्यानुसार ज्यांनी त्यांनी बोलावे. संभाजी महाराजांच्या महत्वाच्या कामाची नोंद घेतली ती महत्वाची आहे. राज्याचे रक्षण करण्यासाठी त्यांनी एक महत्वाचे काम केले, त्यामुळे त्यांना बिरुदावली लावली त्यात वावगं नाही.
मुळ मुद्दे डायव्हर्ट होताहेत
शरद पवार म्हणाले, अजित पवार काय म्हणाले हे मी टीव्हीवर पाहीले त्यानंतर मी यावर बोललो. पण जितेंद्र आव्हाड काय बोलले हे मला माहीत नाही. राज्यातील मुळ गोष्टी महत्वाच्या आहेत. लोक अस्वस्थ आहेत. हे बाजूला ठेवून त्यापासून दुर सरकार नेत आहे. लोकांचे मुद्दे डायव्हर्ट केले जात असून लव्ह जिहादचा मुद्दाही त्यातूनच पुढे आलाय.
एकदाचे काय ते करुन टाका!
शरद पवार म्हणाले, देश आणि राज्याची सत्ता भाजपकडे आहे. त्यामुळे काय कायदा करायचा हे त्यांच्या हाती आहे. लोकांना विश्वासात घेऊन काय जे करायचे तो निर्णय घेऊन टाकावा. कुणाचाही विरोध नाही त्याला.
कोर्टाचा निर्णय मान्य करायला हवा
शरद पवार म्हणाले, नोटबंदीचा निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपण मान्य करायला हवा. तेलंगणा राष्ट्रीय समिती भारतीय नाव धारण करुन महाराष्ट्रापासून कॅम्पेनची सुरुवात करीत आहेत. ज्याला त्याला विस्तार करण्याचा अधिकार आहे.
नड्डांच्या वक्तव्याचे आश्चर्य वाटते!
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र दौऱ्यावर आले आणि त्यांनी मिशन 45 केले. यावर शरद पवार म्हणाले, याचे मला आश्चर्य वाटते. त्यांनी मिशन 48 करायला हवे होते. कारण महाराष्ट्रात 48 जागा आहेत. महाविका आघाडीवर त्यांनी आरोप केला हे वाचण्यात आले. ते जे काही म्हणतात, आत्ताच त्यांच्या राज्यात निवडणुका झाली. यात भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या राज्यातही निवडणूक होती. त्यांना सत्तेतून लोकांनी मतदान करुन दुर केले. केंद्रात त्यांची सत्ता असतानाही त्यांना हरीयाणात सत्ता आणता आली नाही. ते दुसऱ्या राज्यात काय बोलतात याला महत्व नाही.