पुणे-: प्रतिनिधी
एकीमध्ये बळ असते. एकजूट असेल तर शासन व प्रशासनाला नमवता येते. त्यासाठी संघटना गरजेची आहे. आपले प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवू, असे प्रतिपादन महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे संस्थापक अध्यक्ष बाबा कांबळे यांनी केले.
हडपसर इंडस्ट्रीयल इस्टेट, किर्लोस्कर कंपनीच्या मुख्य चौकात नवीन अष्टविनायक रिक्षा स्टँन्ड उदघाटन समारंभ कार्यक्रम बाबा कांबळे यांच्या हस्ते पार पडला. या वेळी बाबा कांबळे बोलत होते.
या वेळी नगरसेविका हिमालीताई कांबळे, नगरसेवक आनंद अलकुंटे, महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे पुणे शहर अध्यक्ष शफिक पटेल, पदाधिकारी वरिष्ठ उपाध्यक्ष मोहम्मद शेख उपाध्यक्ष अर्शद अन्सारी अविनाश वाडेकर प्रवीण शिखरे विल्सन मस्के इरफान आत्तर तोफिक कुरेशी हडपसर विभाग अध्यक्ष सलीम सय्यद तसेच उपाध्यक्ष आरपीआय पश्चिम महाराष्ट्र दत्ता कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष वामन धाडवे, सामाजिक कार्यकर्ते संजय शेवते, रामभाऊ चौंडकर व महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे सर्व पदाधिकारी तसेच रिक्षा चालक मालक व ड्रायव्हर व प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
यावेळी सदर स्टँडवर वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा घेण्यात आला व काही झाडे लावण्यात आली तसेच काही रिक्षाचालकांचे मुले ज्यांनी उच्च शिक्षण घेऊन पदवी प्राप्त केली अशा दोन रिक्षाचालकांच्या मुलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत सलग्न अष्टविनायक रिक्षा स्टँड उद्घाटन तसेच वृक्षारोपण कार्यक्रमासाठी स्टॅन्ड अध्यक्ष अनिल सावंत भगवंत कडू लहू मंचरे सलीम बाई सय्यद तसेच इतर सहकारी यांनी कार्यक्रमाच्या आयोजनासाठी परिश्रम घेतले,