डॉ दीपक शिकारपूर ह्यांनी लिहिलेल्या “स्मार्ट मोबाईल (साहित्यिकांसाठी )” पुस्तकाचे प्रकाशन
पुणे-उत्कर्ष प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या संगणक तज्ज्ञ डॉ डॉ दीपक शिकारपूर ह्यांनी लिहिलेल्या “स्मार्ट मोबाईल (साहित्यिकांसाठी )” ह्या ३६ व्या पुस्तकाचे आज मराठी साहित्य परिषदेत एका छोटेखानी सोहळ्यात प्रकाशन झाले . ह्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ संगणक तज्ञ पदमभूषण डॉ विजय भटकर होते. ज्येष्ठ साहित्यिक द मा मिरासदार , साहित्य परिषदेचे कार्यवाह मिलिंद जोशी , उत्कर्ष चे सु वा जोशी , ऍस्पायर चे संजय गांधी ह्या प्रसंगी उपस्थित होते.
डॉ भटकर ह्यांनी अध्यक्षीय भाषणात संगणकीय क्रांती व प्रादेशिक भाषेचे पुनर्वलोकन केले . मराठी भाषा हि ज्ञानभाषा व्हावी हि अपेक्षाही त्यांनी ह्याप्रसंगी व्यक्त केली. वैयक्तिक संगणक ह्या एका शोधणे विसाव्या शतकात व्यावसायिक क्रांती झाली . तीच गोष्ट एकविसाव्या शतकात स्मटफोन करेल हे भाकीतही वर्तवले. द मा मिरासदार ह्यांनी ह्या प्रसंगी काही विनोदी आठवणी सांगितल्या व हे पुस्तक नव्या पिढीतील लेखकांना उपयुक्त ठरेल असे सांगितले. श्री मिलिंद जोशी ह्यांनी साहित्य परिषदेच्या डिजिटल धोरणांचा आढावा घेतला. साहित्य परिषद आता पूर्णपणे ऑनलाईन झाली आहे हे नमूद केले. लेखक दीपक शिकारपूर ह्यांनी पुस्तक लिहायची भूमिका विशद केली . ते म्हणाले “एकविसाव्या शतकात संगणक व मोबाईल क्रांतीने जीवन पद्धतीचे सर्व संदर्भ बदलेले आहेत . डिजिटल अर्थव्यवहार, सोशल मीडिया , मार्केटिंग , बँकिंग /अर्थव्यवहार , माहितीची निर्मिती , पुनर्निर्माण , ब्लॉगिंग, इंटरनेट चा सुलभ वापर अशा अनेक बाबी ह्या पुस्तकात हाताळल्या आहेत ” . अश्विनी अंबिके ह्यांनी सूत्रसंचालन केले .