पुणे, ः स्त्रीभ‘ूण हत्या रोखण्यासाठी शासन, प्रशासन, स्वयंसेवी संस्था आणि समाजातील सर्व नागरिकांचे योगदान महत्त्वाचे असून, त्यासाठी ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ ही चळवळ व्हावी, असे मत ’बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. राजेंद्र फडके यांनी व्यक्त केले.
डेक्कन एज्युकेशन सोसायटी, रोटरी क्लब ऑङ्ग पुणे कर्वेनगर, जमनाबाई सेवा संघ यांच्या वतीने ङफर्ग्युसन महाविद्यालयात ‘आदिशक्ती’ उपक‘माअंतर्गत विविध क्षेत्रांत उ‘ेखनिय कामगिरी करणार्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. ङ्गडके बोलत होते.
डॉ. फडके पुढे म्हणाले, ‘आपल्या संस्कृतीत स्त्रियांचा आदर केला जातो. मात्र या संस्कृतीत विकृती आल्याने स्त्रीभ‘ूण हत्या वाढल्या. मुली का नकोशा झाल्या याचा प्रत्येकाने गांभीर्याने विचार केला पाहिजे.’
बालरोगतज्ज्ञ सुधा चौधरी, अभिनेत्री भाग्यश्री देसाई, मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अनघा लवळेकर, मनपाच्या सहायक मु‘य आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळवंत यांचा या वेळी सन्मान करण्यात आला.
फर्ग्युसनच्या उपप्राचार्या डॉ. स्वाती जोगळेकर यांनी प्रास्ताविक, डॉ. दीलीप कुलकर्णी यांनी परिचर करून दिला. ऋतुजा आपटे यांनी सूत्रसंचालन केले.