‘गुरुकुल’चे अध्यक्ष डॉ. अशोक कामत यांनी प्रास्ताविक, बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ यांनी स्वागत आणि रवींद्र कोठावडे यांनी सूत्रसंचालन केले.
समाजातील कोलाहल समजावून घेऊन शिकविले पाहिज -डॉ. एन. एस. उमराणी
पुणे, ता. २५ : कला, साहित्य, संस्कृती, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, व्यापार, व्यवसाय, नोकरी अशा जीवनातील विविध अंगांशी वाणिज्य शाखेचा संबंध आहे. त्यामुळे वाणिज्य शाखेच्या शिक्षकांनी समाजातील कोलाहल लक्षात घेऊन शिकविले पाहिजे. असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांनी व्यक्त केल
‘बृहन महाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय’ (बीएमसीसी) आणि ‘गुरुकुल’ संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉ. श्री. वि. कडवेकर यांच्या शिक्षण क्षेत्रातील 50 वर्षांच्या योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला.
यावेळी ‘वाणिज्य शिक्षणाची भावी दिशा’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. या परिसंवादात डॉ. उमराणी बोलत होते.
बीएमसीसीचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत रावळ, गुरुकुलचे अध्यक्ष डॉ. अशोक कामत, व्यवस्थापन तज्ज्ञ डॉ. प्र. चि. शेजवलकर, मराठवाडा मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष भाऊसाहेब जाधव, अनंतराव थोपटे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, डॉ. विद्याधर भाटे, डॉ. एस. जी. जोशी, डॉ. वसुधा जोशी, डॉ. संजय कंदलगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. उमराणी पुढे म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना चांगला अभ्यासक्रम आणि परीक्षा पद्धती देण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील ज्येष्ठ अनुभवी व्यक्तींच्या मनात काय चालू आहे हे जाणून घेणे आवश्यक आहे. अभ्यासाच्या विविध पद्धतीतून विद्यार्थ्यांमध्ये ज्ञान, वर्तन, संवेदनशीलता आदी मध्ये कसे बदल होतात हे शिक्षकांनी समजून घेतले पाहिजे. तसा विचार विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवला पाहिजे.’
डॉ. शेजवलकर म्हणाले, ‘लहान मोठ्या पासून काही तरी शिकले पाहिजे त्यातून आनंद मिळतो. कडवेकर सरांचे कर्तृत्व, दातृत्व, नेतृत्व वेगळे आहे. ध्येयाची बांधिलकी आणि आत्मविश्वास दांडगा आहे. नावीन्य आणि ध्यास घेऊन काम करणे हा त्यांचा धर्म आहे. त्यांच्यात १०० टक्के सौजन्य आणि सभ्यता आहे. त्यांचे वाचन अफाट आहे. वाणिज्यचे लोक वर्णनात्मक अभ्यास करतात. त्यांनी विश्लेषणात्मक अभ्यास केला पाहिजे. भरपूर वाचन हा कडवेकर यांचा गुण आहे. शिक्षकांनी त्यांचे अनुकरण केले पाहिजे. विद्यार्थ्यांना दैवत मानून शिक्षकांनी सेवा केली पाहिजे.’
सत्काराला उत्तर देताना डॉ. कडवेकर म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना गुंतवून ठेवण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी. शिक्षकांकडून अपेक्षा ठेवताना त्यांना योग्य वेळी वेतन मिळाले पाहिजे. व्यावसायिक शिक्षण पद्धतीशी वाणिज्य शाखेची पदवी जोडणे आवश्यक आहे.’
वसुधा जोशी म्हणाल्या, ‘संशोधनाचा नेहमीच्या जीवनावर परिणाम होत असतो. संशोधन करताना विद्यार्थ्यांनी अभ्यासपूर्ण, तंत्रशुद्ध, सैद्धांतिक मांडणी करावी.’
आजकाल चौकटीत संशोधन केले जाते. समाजाला त्याची गरज आहे की नाही याचा विचार करणे आवश्यक वाटते. संशोधनात उद्योगांना सहभागी करून घेतले पाहिजे. शिक्षाकांचा सहभाग महत्वाची असतो. असे मत डॉ. श्रावण कडवेकर यांनी व्यक्त केले.
डॉ. संजय कंदलगावकर म्हणाले, ‘वाणिज्य शाखेचे स्वरूप उयोजितेकडून व्यावसायिक झाले आहे. वाणिज्य प्रयोगशाळा, कॉमर्स कट्टा, संशोधन, उद्योग भेटी असे उपक्रम राबविण्यात येणे गरजेचे आहे.’
डॉ. एस. जी. बापट यांनी शिक्षकांची बदलती भूमिका याविषयी मत व्यक्त केले. शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी स्वतःचे ज्ञान अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाला पूरक साहित्य पुरविले पाहिजे.
डॉ. विद्याधर भाटे यांनी वाणिज्य विषयक संशोधन सद्यस्थितीवर प्रकाश टाकला. चालू संशोधन पद्धतीत आमूलाग्र बदल करता येणे शक्य आहे. केवळ पुस्तकी संशोधनावर भर देणे योग्य नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.