कुटुंबाचा रिंगटोन ः संवाद हवाच जनवाडी मंडळाचा जिवंत देखावा
पुणे गोखलेनगर-जनवाडी परिसरातील पहिजे सार्वजनिक मंडळ अशी ओळख असणार्या अखिल जनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने यावर्षी मोबाईलच्या अवाजवी वापरामुळे भरकटत चाललेल्या समाजाचे प्रबोधन करणारा जिवंत देखावा किर्तनाच्या माध्यमातून सादर केला आहे.
मोबाईलमुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे, मोबाईलच्या अतिरेकी वापरामुळे वेळेचा अपव्यय होत असून, मानसिक स्वास्थ बिघडत आहे. आपापसात कलहाचे वातावरण निर्माण झाले असून या परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी मोबाईलचा प्रभावीपणे वापर करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने मंडळाने हा सामाजिक विषयावरील देखावा सादर केला आहे. मंडळाच्या परिसरात मोबाईल वापराचे दुष्परिणामाबाबत प्रबोधन करणारी घोषवाक्य लावण्यात आली आहेत.
नयना उमेश वाघ यांनी देखाव्यासाठी लेखन केले आहे. जागृती सेवा संस्थेचे विशेष सहकार्य लाभले आहे. मंडळातील अठरा कलाकारांनी सहभाग घेतला आहे. विनोद सकट मंडळाचे अध्यक्ष असून उमेश वाघ, मनोज नगरकर, नरेश कांबळे, अनिल खुडे, नितीन बसवंत, अभिजीत धाडवे, अमर कांबळे, दादा कांबळे, योगेश शिंगारे, जावेद शेख, सुरज शेट्टी, भूषण भवर हे प्रमुख कार्यकर्ते आहेत.
आरोग्य शिबिर, रक्तदान शिबिर, शालेय साहित्याचे विनामूल्य वाटप, वृक्षारोपण, स्वच्छता मोहिम व राष्ट्रीय उत्सव आदी उपक‘म राबविले जातात. मंडळाचे हे ६७ वे वर्ष आहे.