पुणे- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांना नादब्रम्ह संस्थे तर्फे ” नादब्रम्ह संजीवनी ” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रवींद्र वंजारवाडकर संघचालक, पुणे महानगर यांच्या हस्ते स्मृतिचिन्न देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी डॉ. गौतम छाजेड व जावेद खान यांना ” नादब्रम्ह ” पुरस्कार तर अशोक तुपे यांना उत्कृष्ट गणेशोत्सव कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
तसेच चंद्रकांत सणस (गिरीजा कट्टा) अजय खेडेकर (नगरसेवक ) राजाभाऊ भिलारे (समाज सेवक) धीरज घाटे (नगरसेवक) शिरीष मोहिते (समाजसेवक) आनंद सागरे (समाजसेवक) निरंजन दाभेकर (भरत मित्र मंडळ) वसंत मोरे (नगरसेवक) सचिन जामगे (वंदेमातरम संघटना) सारंग सराफ (समाजसेवक) समीर धनकवडे (समाजसेवक) ऋषिकेश बालगुडे (समाजसेवक) छाया गायकवाड (नायडू हॉस्पिटल नर्स) यांना बाळासाहेब दाबेकर,प्रवीण परदेशी,गणेश घुले, अण्णा थोरात, दत्ता सागरे ,पराग ठाकूर यांच्या हस्ते” संजीवनी नादब्रम्ह” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या वेळी बोलताना नगरसेवक दीपक मानकर म्हणाले कि कोरोनाच्या काळात या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांनी या समाजाला, या पुण्याला, पुणेकरांना संजीवनी देण्याचे कार्य केले आहे. दिवस रात्र सर्वांनी स्वतःला झोकून, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता समाजासाठी नाद करून गरजू राष्ट्र बंधू, भगिनींना जगण्यासाठी नवी संजीवनी दिली, सर्वांचे कार्य उल्लेखनीय आहे पण, जावेद खान यांनी कोरोना च्या काळात जे कोरोनामुळे मृत्यूमुखी पडले अशा सातशे ते आठशे राष्ट्रबांधवांचे अंत्यविधी केले. कोणतीही जात, धर्म,पंथ न बघता आपण भारतीय आहोत या भावनेने सगळ्यांचे अंत्यविधी केले हे फार मोठे कार्य आहे. त्यांचा हा मोठे पणा आहे. तसेच त्यांना पुरस्काररुपी मिळालेले अकरा हजार रुपये,त्यांनी मोठ्या मनाने अयोध्येतील राम मंदिरासाठी रवींद्र वंजारवाडकर याच्या कडे सुपूर्त केले. प्रत्येकाने आपण समाजाला काही देणे लागतो, आपले कर्तव्य समजून समाजासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजसेवी कार्य केले पाहिजे असे मानकर म्हणाले. नादब्रम्ह चे संस्थापक अतुल बेहेरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.